महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने सिद्ध केलेल्या प्रश्नसंचात अभ्यासाबाहेरील प्रश्न !
परीक्षेची सिद्धता करतांना विद्यार्थ्यांना ताण येऊ नये म्हणून राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच सिद्ध करण्याचे दायित्व परिषदेला दिले होते; पण यातील प्रश्न संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असल्याने परीक्षेसाठी नेमका अभ्यास कसा करायचा ? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.