महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा आरोप !
भडगाव (जिल्हा जळगाव) – खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया खताची खरेदी शेतकरी सरकारी कृषी केंद्रांतून करत आहेत; मात्र शेतकरी खरेदीसाठी गेल्यावर त्यांना अन्य रासायनिक खते घेण्याची सक्ती केली जात आहे आणि ते घेण्याची सिद्धता दर्शवल्यास युरिया खत दिले आहे, असा आरोप महाराष्ट्र शेतकरी संघटनेने केला आहे.
युरियासमवेत इतर रासायनिक खते खरेदी करण्याची सक्ती होत असल्याने शेतकर्यांची आर्थिक लूट होत असल्याचा दावा करत संघटनेने चौकशीची मागणी केली आहे. शेतकर्यांना गरज नसलेली अतिरिक्त खतेही घ्यावी लागत आहेत. कृषी केंद्रांकडून होत असलेल्या कथित सक्तीमुळे शेतकर्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, असे निवेदन संघटनेने जिल्हाधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती आदींना दिले आहे.

ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !