पाकच्या सीमेवरील ध्वज उतरवण्याच्या सोहळ्याला पाकच्या नागरिकांची पाठ, तर भारतियांची गर्दी कायम !

आर्थिक दिवाळखोरीमुळे झालेली पाकची ही स्थिती त्याचा अंत जवळ आल्याचेच दर्शक आहे !

यवतमाळ जिल्ह्यात अवेळी पडलेल्या पावसाने मोठी हानी !

जिल्ह्यात ३ दिवसांपासून चालू असलेल्या वादळी वार्‍यासमवेत गारपीट आणि पाऊस यांमुळे उन्हाळी शेतपिकांची मोठी  हानी झाली आहे. अंदाजे ३ सहस्र हेक्टरवरील उन्हाळी पिके नष्ट झाली आहेत.

धर्मादाय रुग्‍णालयांतील गरिबांसाठीच्‍या राखीव खाटांची माहिती ‘अ‍ॅप’द्वारे मिळणार !

धर्मादाय रुग्‍णालयांमध्‍ये निर्धन आणि आर्थिकदृष्‍ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्‍या जागांपैकी किती खाटा शिल्लक आहेत ?यासाठीचा ‘अ‍ॅप’ प्राधान्‍यक्रमाने सिद्ध करण्‍याचा आदेश आरोग्‍यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी प्रशासनाला दिला आहे.

गेल्या वर्षात भारत आणि रशिया यांच्यात ३६३ लाख कोटी रुपयांचा व्यापार !

भारत आणि रशिया यांच्यातील व्यवसाय हा मुख्यत्वे भारताने रशियन तेल मोठ्या प्रमाणात विकत घ्यायला आरंभ केल्याने वाढला. मार्च २०२३ मध्ये भारताने एका दिवसात अधिकाधिक १६ लाख ४० सहस्र बॅरेल तेल विकत घेतले.

१ मे पासून ‘शिर्डी बंद’ची हाक !

न्यायालयाच्या निर्देशानंतर साईबाबा संस्थानने केंद्रीय सुरक्षा देण्यास सिद्धता दर्शवली आहे. यामुळे ग्रामस्थांनी या विरोधात न्यायालयीन लढा देण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने निधी जमावण्यासाठी ग्रामस्थांनी भिक्षा झोळी आंदोलनही केले होते.

बारसू येथील प्रकल्पाला ७०  टक्क्यांहून अधिक लोकांचे समर्थन ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आंदोलन करणारे काही लोक स्थानिक, तर काही बाहेरचे होते. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पाच्या कामासाठी बळजोरी केली जाणार नाही. प्रकल्पामुळे नागरिकांना रोजगार मिळेल.

करमाळा तालुक्‍यातील (सोलापूर) श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्‍यावर प्रशासकाची नियुक्‍ती !

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्‍यावर सध्‍या बागल गटाची सत्ता होती. ‘आदिनाथ कारखाना बारामती अ‍ॅग्रो’ला भाडेतत्त्वावर देण्‍याची प्रक्रिया रहित करून कारखाना सहकारी तत्त्वावर ठेवण्‍यात आला होता

सोलापूरची ऑक्‍सिजन पातळी वाढवण्‍यासाठी ५०० एकर भूमीवर उभारणार वनउद्यान !

सोलापूर शहरातील ऑक्‍सिजनची पातळी वाढवण्‍यासाठी शहरातील ५०० एकर वनभूमीवर वनउद्यान उभारण्‍यात येणार असल्‍याची घोषणा राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य आणि मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

पावसाळ्यापूर्वीच परशुराम घाटातील महामार्गाचे काम पूर्ण करून दुतर्फा वाहतूक चालू होण्याची शक्यता !

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट दिवसातील ५ घंटे वाहसुकीस बंद ठेवल्याने चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे. या घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून तो बुजवण्याचे काम चालू करण्यात आले आहे.