
सातारा, १ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या मार्गदर्शनाखाली करवसुलीची मोहीम तीव्र केली होती. यामुळे मार्च मासाच्या शेवटी पाणीपट्टी ८७ टक्के, तर घरपट्टी करवसुली ८९ टक्के झाली. यातून ग्रामपंचायतींना अनुमाने ११५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे ग्रामीण विकासकामांना याचा लाभ होणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या वतीने नागरिकांना विविध सुविधा देण्यात येतात. यासाठी ग्रामपंचायती वार्षिक कर आकारणी करतात. मार्च मासाच्या शेवटी हा कर ग्रामपंचायतीमध्ये भरावा लागतो. यासाठी विशेष करवसुली मोहीम राबवून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागते. काही नागरिक कर थकवतात. त्यामुळे जानेवारी मासापासून ही मोहीम तीव्र करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसर्या वर्षी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची पाणीपट्टी आणि घरपट्टी करवसुली चांगली झाली आहे.
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
शहरवासियांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा ! – निमेश नायर
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री