
सातारा, १ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या मार्गदर्शनाखाली करवसुलीची मोहीम तीव्र केली होती. यामुळे मार्च मासाच्या शेवटी पाणीपट्टी ८७ टक्के, तर घरपट्टी करवसुली ८९ टक्के झाली. यातून ग्रामपंचायतींना अनुमाने ११५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे ग्रामीण विकासकामांना याचा लाभ होणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या वतीने नागरिकांना विविध सुविधा देण्यात येतात. यासाठी ग्रामपंचायती वार्षिक कर आकारणी करतात. मार्च मासाच्या शेवटी हा कर ग्रामपंचायतीमध्ये भरावा लागतो. यासाठी विशेष करवसुली मोहीम राबवून करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागते. काही नागरिक कर थकवतात. त्यामुळे जानेवारी मासापासून ही मोहीम तीव्र करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसर्या वर्षी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींची पाणीपट्टी आणि घरपट्टी करवसुली चांगली झाली आहे.
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !