२५० किलो गोमांसाची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी यवत (जिल्हा पुणे) येथे ६ धर्मांधांवर गुन्हा नोंद !
दौंड येथील पशूवधगृहातून पुणे येथे ४ जून या दिवशी गोमांसाची अवैध वाहतूक होणार असल्याची बातमी गोरक्षा दल महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार ही गाडी पकडण्यासाठी मानद पशूकल्याण अधिकारी ऋषिकेश कामथे, गोरक्षक अक्षय कांचन, राहुल कदम, प्रतीक कांचन, विशाल राऊत हे उरळी कांचन येथील मुख्य चौकात पहार्यासाठी थांबले होते.