उत्तरप्रदेशमधून एका घुसखोर रोहिंग्याला अटक

देशात सहस्रो रोहिंग्या मुसलमानांनी घुसखोरी केली असतांना एकाला अटक करण्यातून काय साध्य होणार ? घुसखोरांना बनावट कागदपत्रे सिद्ध करण्यासाठी साहाय्य करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांचाही शोध घ्या आणि त्यांना देशद्रोही घोषित करून आजन्म कारागृहात टाका !

पारपत्राचा कालावधी संपूनही ४ लाख २१ सहस्र २५५ विदेशींचा भारतात अवैधरित्या निवास, शोध घेण्यासाठी महाराष्ट्रात समितीची स्थापना

अधिकृत पारपत्राद्वारे देशात प्रवेश करून त्यानंतर अवैध वास्तव्य करणार्‍या विदेशींची इतकी संख्या असेल, तर भारतात घुसखोरी करणारे किती बांगलादेशी असतील !

सरपंचपदाच्या निवडीसाठी होत असलेल्या लिलावाच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोग जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल घेणार

सरपंचपदासाठी पैशांची बोली लागणे ही लोकशाहीची थट्टा !

राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशीची शक्यता

राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता आहे. राज्यात वर्ष २००८ ते २०११ या कालावधीत कृषी विभागाच्या सूक्ष्म सिंचन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता.

बचतगटांच्या २२ लाख रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी दोन बचतगटाच्या तीन महिलांना पोलीस कोठडी 

शासनाकडून बचतगटांना काम दिले जाते तसेच त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो, असे असतांना भ्रष्टाचार करून बचतगटाच्या मूळ संकल्पनेलाच सुरूंग लावणार्‍यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !

पोलीसदलाचे सध्याचे ब्रीदवाक्य ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश’ पोलीस सार्थकी लावतात का ?

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात राज्य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाने हिंदूंना हिंदु धर्म आणि साधना न शिकवल्यामुळे देशात भ्रष्टाचार अन् सर्व प्रकारचे गुन्हे पुष्कळ वाढले आहेत, हे एकाही सरकारला कळले कसे नाही ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

एटा (उत्तरप्रदेश) येथे पाकिस्तानी महिलेची सरपंचपदी निवड झाल्याच्या वर्षभरानंतर प्रशासनाला जाग !

भारतीय प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारी लज्जास्पद घटना ! जगात कुठल्याही देशात अशा घटना घडत नाहीत, ज्या भारतात घडतात, हे संतापजनक ! याला उत्तरदायी असणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

समाजवादी पक्षाचे माजी खाणमंत्री गायत्री प्रजापती यांचे घर आणि कार्यालये यांवर ईडीच्या धाडी

एवढी अवैध संपत्ती जमा करेपर्यंत अन्वेषण यंत्रणा झोपल्या होत्या का ? कि त्यांना त्या वेळी कारवाई न करण्यासाठी लाच देण्यात आली होती ? देशातील अन्य भ्रष्ट आजी-माजी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे किती अवैध संपत्ती असेल, कोण जाणे !

‘सेल्फ चेक’ वापरून सांताक्रूझ पंचायतीमधील लाखो रुपये काढल्याविषयी होप फाऊंडेशन या संस्थेकडून तक्रार नोंद

‘सेल्फ चेक’ वापरून सांताक्रूझ पंचायतीच्या बँक खात्यातून लाखो रुपये काढण्यात आल्याविषयी होप फाऊंडेशनने पंचायतीचे अधिकारी, सचिव आणि कॅनरा बँकचे अधिकारी यांच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी खात्याकडे तक्रार नोंद केली आहे.