Smart Border Project : पाकिस्तान आणि बांगलादेश येथून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट’ची घोषणा !
सीमा सुरक्षा दलाच्या दीक्षांत समारंभात आणि ‘रुस्तमजी स्मृती व्याख्याना’त गृहमंत्री शहा म्हणाले की, देशाची सुरक्षा आता केवळ पारंपरिक पद्धतींवर अवलंबून राहू शकत नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने भारताच्या सीमा पूर्णपणे ‘अभेद्य’ केल्या जातील.