क्रांतीकारकांच्या बलीदानाच्या पुण्यस्मरणाने अखंड भारताच्या निर्मितीसाठी तरुणांची मानसिकता घडेल ! – डॉ. अजय कुलकर्णी, महासचिव, स्वातंत्र्यवीर सावरकर समिती

क्रांतीकारकांच्या बलीदानाचे पुण्यस्मरण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने झाले पाहिजे. तसे झाले, तरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अखंड भारताचे जे स्वप्न होते, त्याच्या निर्मितीसाठी आजच्या तरुणांची मानसिकता घडेल.

धोरणकर्त्याच्या अंतःकरणाला पाझर फुटणारे साहित्य निर्माण व्हायला हवे ! – डॉ. अशोक ढवण, कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

धोरणकर्त्याच्या अंतःकरणाला पाझर फुटत नाही तोपर्यंत हे साहित्य वांझोटे ठरेल, अशी खंत डॉ. अशोक ढवण यांनी व्यक्त केली. ते ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी साहित्यातील शेतकऱ्याचे चित्रण : किती खरे किती खोटे ?’ या परिसंवादाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

समाज, राष्ट्र यांना अनुकूल असे लिखाण साहित्यातून व्हावे ! – नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूक आणि रस्ते परिवहन मंत्री

समाजात चांगले-वाईट असे सर्वच असते; मात्र आपल्याला गुणात्मक परिवर्तन करणाऱ्या आणि विकासाची दिशा देणाऱ्या साहित्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यापुढील काळात समाज, राष्ट्र यांना अनुकूल असे लिखाण साहित्यातून व्हावे, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.

श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी जवळील औरवाड (जिल्हा कोल्हापूर) येथे रमजानच्या काळात अवैध पशूवधगृहावर धाड : १५ देशी गायींना जीवदान !

गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्थेचे श्री. नितेश ओझा, तसेच अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे श्री. अंकुश गोडसे यांना विश्वसनीय सूत्रांकडून श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी जवळील औरवाड मध्ये गायींची कत्तल होत असल्याविषयी माहिती प्राप्त झाली.

कायद्याच्या चौकटीत राहून अजान ध्वनीक्षेपकावरूनच देणार ! – पुण्यातील मुसलमान संघटनांची भूमिका

पुण्यातील ५०० मशिदींना आम्ही ध्वनीक्षेपक अनुमती संबंधी अर्ज पाठवले आहेत. त्यातील अनेक ठिकाणी अनुमती आहे. मशिदींचे व्यवस्थापन करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केली जात आहे

वणीत ग्राहक बनून दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी कार्यरत

पटवारीनगरमधील औषधांच्या दुकानातील ‘सीसीटीव्ही’मधून ही टोळी चोरी करत असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अन्वेषण करत आहेत.

उषा तांबे यांची साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड !

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचा अध्यक्षपदाचा कालावधी संपल्याने मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत मुंबई साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांची साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

ब्राह्मणांविषयी अपशब्द वापरणाऱ्या आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात संभाजीनगर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे झालेल्या एका कार्यक्रमात ब्राह्मण समाजाविषयी अपशब्द वापरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या निषेधार्थ येथील क्रांती चौक येथे २२ एप्रिल या दिवशी शहरातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांतील हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन केले.

साहित्य संमेलनस्थळी ‘योग वेदांत सेवा समिती’कडून विनामूल्य सरबत वाटप !

मराठी साहित्य संमेलनाच्या ठिकाणी परगावहून येणाऱ्या अनेक लोकांना कडाक्याच्या उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी ‘योग वेदांत सेवा समिती, उद्गीर आणि लातूर’ विभागाच्या वतीने विनामूल्य ‘पलाश सरबत’चे वाटप करण्यात येत आहे.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ठिकठिकाणी अमोल मिटकरी यांच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाज आणि पुरोहित वर्ग यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ठिकठिकाणी तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या, तसेच बीड येथे निवेदन देण्यात आले.