देशातील प्रत्येक भूमीला देण्यात येणार ‘युनिक आयडेन्टीफिकेशन’ क्रमांक !

मार्च २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक भूमीला १४ आकडी ‘युनिक आयडेन्टीफिकेशन’ क्रमांक देण्याची योजना केंद्र सरकारकडून बनवण्यात आली आहे. या क्रमांकाला महसूल नोंदी, बँकेचा खाते क्रमांक आणि आधार क्रमांक हेही जोडण्यात येणार आहेत.

आरोग्यविषयीची संसाधने वाढत्या रुग्णांपुढे न्यून पडल्यास दळणवळण बंदी करावी लागते ! – आरोग्यमंत्री राजेश टोपे

दळणवळण बंदी हा शेवटचा पर्याय आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य सरकारला याविषयी चिंता आहे. ही रुग्णसंख्या रोखण्यासाठी जे करणे आवश्यक आहे, ते सरकारकडून केले जात आहे. संसाधनांची कमतरता पडू दिली जाणार नाही.

वैद्यकीय वापरासाठी ८० टक्के आणि औद्योगिक वापरासाठी २० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे निर्देश

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यशासनाचा निर्णय !

डोंबिवली येथे नियमाचा भंग करणार्‍या १२५ आंदोलनकर्त्या व्यापार्‍यांवर गुन्हे नोंद

प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पाटील यांच्या तक्रारीवरून आंदोलनकर्त्या १२५ व्यापार्‍यांवर डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.

पुणे येथील ससून रुग्णालयात सर्वाधिक कोरोना मृत्यू का ? – केंद्रीय आरोग्य सचिवांचा प्रश्‍न

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरसिंग’द्वारे घेतलेल्या बैठकीला पुणे आणि मुंबई येथील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या वेळी अग्रवाल यांनी पुणे-मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या संसर्गाविषयी विचारणा केली.

छत्रपती शिवाजी महाराज : मराठ्यांचा गौरवशाली इतिहास !

छत्रपती शिवाजींच्या काळात पातशाह्या आणि फितूर नागरिक हे शत्रू होते. आज चीन, पाकिस्तान, आतंकवादी, नक्षलवावादी आणि देशद्रोही असे शत्रू आहेत. यांवर विजय मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धकला अन् कौशल्य यांचे विशेष महत्त्व आहे.

विरोधकांनी केलेली राष्ट्रपती राजवटीची मागणी निरर्थक ! – प्रणिती शिंदे, आमदार, काँग्रेस

अधिकार्‍यांना केंद्रातील भाजप सरकारचा पाठिंबा असून त्याविना हे होऊ शकत नाही, असा आरोप काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांवर केला.

उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हे नोंद, तर ४ जणांना अटक

हिंदूंकडून शांततेत आणि नियम पाळून आरती केल्यावर आणि त्यात धर्मांधांनी अडथळा आणल्यावर हिंदूंवर गुन्हे का नोंद करण्यात आले ? हा पोलिसांचा पक्षपातीपणा आहे, असे हिंदूंना वाटते.

हिंदवी स्वराज्य स्थापले अजरामर !

बघून, बोलून नाही बदलत इतिहास ।
त्यासाठी हवा शिवाजीचा, संभाजीचा ध्यास ॥

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून धिंगाणा घालणार्‍या २ महामार्ग पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद !

सबा बावडा येथील १०० फुटी रस्त्यावर मद्यपान करून धिंगाणा घालणार्‍या तिघांवर कारवाई केली आहे. यात बळवंत पाटील आणि राजकुमार साळुंखे या दोन महामार्ग पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे.