खानयाळे येथे तिलारी धरणाचा कालवा फुटला

तालुक्यातील तिलारी धरणाचा उजवा तीर कालवा खानयाळे येथे  फुटला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे, तसेच दोडामार्ग-तिलारी राज्यमार्गावर आवाडे येथे नदीला पूर येऊन पुलावर पाणी आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.

हिंदु राष्ट्र हेच प्रजासत्ताक राष्ट्र अन् तीच खरी आनंद पर्वणी ।

२६ जानेवारी २०२१ या भारताच्या ७१ व्या प्रजासत्ताक दिनाप्रीत्यर्थ ईश्‍वरी पे्ररणेने स्फुरलेली कविता 

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश यांसह उत्तर भारतात शीतलहर

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश राज्यांत शीतलहर आल्याचे दिसून येत आहे. येथे बहुतांश भागांमध्ये बर्फवृष्टीही होत आहे. हिमाचल प्रदेशात कुफरी, भरमौर, किलाँग आणि कल्पा या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊसही झाला.

रामाचे नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवे, गळा दाबून नाही ! – तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ

नुसरत जहाँ यांनी हाच सल्ला ममता बॅनर्जी यांना दिला पाहिजे ! या देशात रहाणार्‍यांनी ‘जय श्रीराम’ म्हणण्यासह जे म्हणत आहेत, त्यांना साथ दिली पाहिजे; मात्र ममता बॅनर्जी ना ‘जय श्रीराम’ म्हणत आहेत, ना अन्य कुणी म्हटले, तर ते त्या स्वीकरत आहेत.

कायमस्वरूपी जागा देण्याची रवि जाधव यांची मागणी मान्य करणे शक्य नाही ! – नगराध्यक्षांचे स्पष्टीकरण

रवि जाधव यांनी व्यवसायासाठी जागा मिळावी, यासाठी आंदोलन चालू केले आहे. याविषयी नगराध्यक्ष परब म्हणाले, सध्या दिलेल्या हंगामी स्टॉलच्या ठिकाणी कायमस्वरूपी जागा मिळावी, ही जावध यांची मागणी मान्य होणे शक्य नाही; कारण नगरपरिषदेने न्यायालयीन प्रक्रिया करून ही जागा रिक्त केली आहे.

५०० अब्ज रुपयांसाठी पाक सरकार महंमद अली जिना यांच्या बहिणीच्या नावे असलेलले पार्क गहाण ठेवणार !

पुढे संपूर्ण पाकला विकायला काढावे लागण्याची स्थिती निर्माण होणार आहे, यात कुणीच शंका घेण्याची आवश्यकता नाही !

गोवा माईल्स या टुरिस्ट टॅक्सीसेवेविषयी मंत्री मायकल लोबो यांचेच प्रश्‍नचिन्ह !

मंत्री मायकल लोबो म्हणाले, गोवा माईल्स सेवेला दाबोळी विमानतळावर काऊंटर का देण्यात आला आहे ? ही सेवा अ‍ॅपवर आधारित असल्याने प्रवासी अ‍ॅपच्या माध्यमातून या सेवेचा काऊंटरशिवाय सहजतेने लाभ घेऊ शकतात. या सेवेमुळे पारंपरिक टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे…

धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी समाजमनाला जागृत करणारी सनातनची ग्रंथमालिका !

सध्या राष्ट्र आणि हिंदु धर्म यांची स्थिती केविलवाणी झाली आहे. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करायचे असेल, तर त्याविषयी समाजात वैचारिक क्रांतीची ज्वाला भडकणे आवश्यक आहे. याविषयी प्रबोधन करणारी, प्रत्येक राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांनी वाचावी अशी ग्रंथमालिका !

पत्नीच्या बँक खात्यांचा तपशील मागण्याचा अधिकार पतीला नाही ! – केंद्रीय माहिती आयोग

केंद्रीय माहिती आयोगाने म्हटले की, एखाद्याने प्राप्तीकर विवरणपत्र भरणे ही सार्वजनिक गोष्ट होऊ शकत नाही. नागरिकाने कर भरणे हे कर्तव्य बजावण्यासारखे आहे. त्यामुळे व्यापक जनहिताचा उद्देश नसेल, तर अशी माहिती अर्जदाराला देता येणार नाही.

रेडी येथील युवकांना रोजगार द्या अन्यथा प्रकल्पासाठी घेतलेल्या भूमी परत करा ! – प्रीतेश राऊळ, जिल्हा परिषद सदस्य

तालुक्यातील रेडी येथील बंद पडलेल्या टाटा मेटालिक कंपनीच्या जागेत नवीन प्रकल्प चालू करा अन्यथा शेतकर्‍यांच्या घेतलेल्या भूमी त्यांना परत करा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती तथा विद्यमान सदस्य प्रीतेश राऊळ यांनी केली आहे.