
अकोला, ५ मार्च (वार्ता.) – संत नामदेव महाराज यांची यावर्षी ७५० वी जयंती असतांना त्यांचे शासकीय अभिवादन यादीतून वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्यात यावे आणि कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, असे सांगून राज्य सरकारने धार्मिक कार्यक्रमांवर आणलेली बंदी हटवावी, या वारकर्यांच्या २ प्रमुख मागण्या राज्यअधिवेशनामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २ मार्च या दिवशी मांडल्या.

याविषयी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. वरील दोन्ही मागण्यांची राज्य सरकारने त्वरित नोंद घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटना एकत्र येऊन भव्य स्वरूपाचे आंदोलन करणार आहेत, असेे ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी म्हटले आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !