
अकोला, ५ मार्च (वार्ता.) – संत नामदेव महाराज यांची यावर्षी ७५० वी जयंती असतांना त्यांचे शासकीय अभिवादन यादीतून वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्यात यावे आणि कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, असे सांगून राज्य सरकारने धार्मिक कार्यक्रमांवर आणलेली बंदी हटवावी, या वारकर्यांच्या २ प्रमुख मागण्या राज्यअधिवेशनामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २ मार्च या दिवशी मांडल्या.

याविषयी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. वरील दोन्ही मागण्यांची राज्य सरकारने त्वरित नोंद घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व वारकरी संघटना एकत्र येऊन भव्य स्वरूपाचे आंदोलन करणार आहेत, असेे ह.भ.प. गणेश महाराज शेटे यांनी म्हटले आहे.
कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकर्यांना ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी’च्या निकषांपलीकडे जाऊन आर्थिक साहाय्य देणार
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात