|

नवी देहली – कुंभमेळ्याला काही अर्थ नाही. ती फालतू गोष्ट आहे, असे संतापजनक वक्तव्य बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी केले. देहलीत झालेल्या रेल्वेस्थानकावरील चेंगराचेंगरीवरून यादव यांनी वरील वक्तव्य केले आहे.
🚨 Outrageous Statement! 🚨
RJD President & former Railway Minister, Lalu Prasad Yadav makes a shocking anti-Hindu comment, saying ‘Kumbh has no meaning and it’s a useless thing’.
By politicizing the recent stampede in Delhi, Yadav is trying to score political points and fuel… pic.twitter.com/LTxjmpls6b
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 16, 2025
यादव यांनी अपघातासाठी रेल्वे विभागाला उत्तरदायी धरले असून रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांना या घटनेचे दायित्व घेण्याची मागणी केली आहे. यादव म्हणाले की, या घटनेत सहभागी असलेल्या सर्व लोकांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. ही रेल्वेची चूक आहे, रेल्वेच्या गैरव्यवस्थापनामुळे इतके लोक मृत्यूमुखी पडले आहेत.
यादव यांच्या या वक्तव्यावरून ते रेल्वेमंत्री असतांना वर्ष २००४ मध्ये छठपूजेच्या वेळी देहली रेल्वेस्थानकावर अशा प्रकारचीच चेंगराचेंगरी झाल्याची आठवण सामाजिक माध्यमांतून लोक त्यांना करून देत आहेत.
संपादकीय भूमिका
|