
चिपळूण – रत्नागिरी आतंकवादविरोधी पथकाने तालुक्यातील खेर्डीसह शहरातील मार्कंडी परिसरातून ४ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. हे घुसखोर बंगालमार्गे कोलकात्याहून महाराष्ट्रात घुसल्याचे पोलीस अन्वेषणातून उघड झाले आहे. या बांगलादेशींकडे कोणतीही कागदपत्रे सापडली नसल्याने त्यांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध पारपत्र भारत प्रवेश नियम १९५० चा नियम ३ सह ६ परकीय नागरिक आदेश १९४८ परि.३ (१) अ, परकीय नागरिक आदेश १९४६ कायदा कलम १४ सह गुन्हा नोंदवेला आहे.
काही दिवसांपूर्वी रत्नागिरी आतंकवादविरोधी पथकाने शहराजवळील खेर्डी येथून रुख्साना आलमगीर मंडल आणि आलमगीर अरबली मंडल या २ बांगलादेशी पती-पत्नीला अटक केली होती. यानंतर लगेचच महंमद हसनअली आणि असाद कामरू जवान सिरीना या आणखी २ बांगलादेशींना अटक करण्यात आली.
संपादकीय भूमिकाबांगलादेशी घुसखोरांनी पोखरलेला भारत ! बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात सरकार कठोर पावले केव्हा उचलणार ? |
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !