हत्तींपासून गावाचे रक्षण करू न शकणारे पोलीस आणि सरकार !

‘दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मोर्ले गावात ४ हत्तींच्या कळपाने केळी, सुपारी आणि नारळ यांच्या बागायतींसह शेतीसाठीच्या पाण्याची जलवाहिनी, तसेच कुंपण उद्ध्वस्त केले. येथील शेतकरी आणि बागायतदार यांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या बागा भुईसपाट झाल्याने त्यांची मोठी हानी झाली आहे.’ (२३.३.२०२४)