काश्‍मिरी पंडितांवरील अत्‍याचारांस ‘अजान’च कारणीभूत ! – श्रवण कुमार रायकर, हिंदू महासभा, कर्नाटक

लाऊडस्‍पीकर

दिवसातून ५ वेळा ‘लाऊडस्‍पीकर’द्वारे ‘अजान’ (नमाजपठणाला लोकांना बोलवण्‍यासाठी उच्‍चस्‍वरात दिली जाणारी बांग) देण्‍याची पद्धत आहे. ही बांग प्रत्‍येक गल्लीत ऐकायला येण्‍यासाठी मोठ्या आजावात दिली जाते. याचा प्रत्‍येकाला त्रास होतो. मी देहलीला गेलो असतांना कौर नावाच्‍या एका लेखिकेने सांगितले, ‘‘वर्ष १९९० मध्‍ये काश्‍मिरी पंडितांना काश्‍मीर सोडून जावे लागले होते. धर्मांध मुसलमानांनी संध्‍याकाळी ‘अजान’ दिल्‍यामुळे काश्‍मिरी लोकांवर अत्‍याचार झाले होते. त्‍याच दिवशी हिंदूंंची हत्‍या झाली होती आणि काश्‍मिरी पंडितांना काश्‍मीरच्‍या बाहेर पडावे लागले होते.’’

येणार्‍या काळासाठी ही धोक्‍याची घंटा !

या सूत्रावर आपण गांभीर्याने विचार करण्‍याची परिस्‍थिती आली आहे. गुजरातमध्‍ये गोध्रा येथे घडलेल्‍या घटनेच्‍या वेळीही अशीच परिस्‍थिती उद़्‍भवली होती. माझ्‍या मते या ‘अजान’मुळे पुष्‍कळ गडबड होणार आहे. येणार्‍या काळासाठी ही धोक्‍याची घंटा आहे. ‘अजान’ थांबवण्‍यासाठी आम्‍ही पहाटे आमच्‍या गावातील संतोषीमातेच्‍या मंदिरात आरती करणे चालू केले होते. हिंदूंनी ‘अजान’च्‍या धोक्‍यापासून जागरूक राहिले पाहिजे. यासाठीच दक्षिण भारतात हिंदु महासभेचा प्रसार करण्‍याचा मी प्रयत्न करत आहे.