आसाममध्ये मुसलमानबहुल भागात निवडणुकीत यश न मिळाल्याने घेतला निर्णय !
|

नवी देहली – नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये भाजपाला बहुमत मिळाले असले, तरी मुसलमानबहुल ८ मतदारसंघांपैकी एकाही मतदारसंघात भाजपाला विजय मिळू शकला नाही. त्यामुळे भाजपाच्या राज्य कार्यकारिणीने राज्यातील अल्पसंख्याक मोर्चाच्या सर्व शाखा विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे.
Assam BJP disbands its minority cell after failing to make inroads in the Muslim-dominated areas in assembly electionshttps://t.co/1LFPLNVwcf
— OpIndia.com (@OpIndia_com) May 5, 2021
१. भाजपचे आसाममधील प्रदेशाध्यक्ष रंजित दास यांनी सांगितले की, भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या राज्य, जिल्हा आणि मंडळ स्तरावरील सर्व शाखा तात्काळ विसर्जित करण्यात येत आहेत. आमच्या पक्षाच्या महिला, युवा आणि इतर विविध कार्यकारणी आहेत. तसाच अल्पसंख्यांक मोर्चाही आहे. आम्ही अल्पसंख्यांकांचे प्राबल्य असलेल्या काही मतदारसंघात उमेदवार दिले होते; मात्र या मतदारसंघांमधील अनेक बुथवर आमच्या उमेदवारांना २० मतेही मिळाली नाहीत, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.
२. भाजप राज्य अल्पसंख्यांक मोर्चाचे प्रमुख मुख्तार हुसेन खान यांनी या निर्णयामागचे नेमके कारण काय आहे ठाऊक नाही, असे सांगितले. पक्षाला अनेक ठिकाणी अपेक्षेएवढी मते मिळाली नाहीत, असेही ते म्हणाले.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
बस नाम रहेगा अल्लाह का ?
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !