रूपी बँक ठेवीदार हक्क समितीची मागणी

पुणे – रूपी बँकेचे विलिनीकरण महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये करावे हा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे प्रलंबित आहे. या प्रकरणात राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी रूपी बँक ठेवीदार हक्क समितीने पत्रकार परिषदेत केली. रूपी बँक ठेवीदार हक्क समितीकडून यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत रिझर्व्ह बँकेला याविषयीची भूमिका मांडावी लागणार आहे. रूपी बँकेच्या प्रशासक मंडळाची मुदत २८ फेब्रुवारीला संपत आहे. आता रिझर्व्ह बँकेने मुदतवाढ न दिल्यास ५ लाख ठेवीदारांच्या अनुमाने १ सहस्र ३०० कोटींच्या ठेवी मागील ८ वर्षांपासून अडकून पडल्या आहेत.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली