कठुआ (जम्मू-काश्मीर) – येथे आतंकवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत ५ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले, तर त्याच वेळी ४ पोलिसांना वीरमरण आले. येथील जंगलात आतंकवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर करण्यात आलेल्या कारवाईत ही चकमक झाली. येथे एकूण १० आतंकवादी लपल्याची माहिती मिळाली आहे. येथे ही चकमक अद्यापही चालू असल्याचे सांगितले जात आहे. ठार झालेले आतंकवादी जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेचे सदस्य होते.
🚨 J&K Encounter: 5 Terrorists Eliminated, 5 Bravehearts Martyred! 🇮🇳
Sacrifice of our heroes continues…
But as long as Pakistan fuels terror, Kashmir won’t see peace!
When will India strike at the root of the problem?
PC: @Jansatta pic.twitter.com/b9kyXcL6jx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 29, 2025
संपादकीय भूमिकाकाश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार मारले, तरी जोपर्यंत त्यांचा निर्माता, म्हणजे पाकिस्तानला भारत नष्ट करत नाही तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही. त्यामुळे भारत मुळावर कधी घाव घालणार ? |