
मुंबई – संसदेत विधेयक मांडतांना कुणाचे न ऐकता निर्णय घेण्यात आला. त्या वेळी लोकसभेत विधेयकावर चर्चा करण्यात आली नाही. घाईघाईने निर्णय घेण्यात आला. आता त्याचे परिणाम मोदी शासनाला भोगावे लागणार आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रशासनाने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकर्यांच्या आंदोलनाविषयी केले. शासनाने शहाणपणाची भूमिका घ्यावी, असा सल्लाही या वेळी शरद पवार यांनी केंद्रशासनाला दिला.

Take farmers’ protest seriously, end deadlock: Sharad Pawar to Centre https://t.co/Of1x6LopTF
— TOI India (@TOIIndiaNews) December 6, 2020
या वेळी शरद पवार म्हणाले, ‘‘कृषी कायद्याच्या विरोधात देहलीच्या सीमेवर चालू असलेले शेतकर्यांचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत चालले आहे. पंजाब आणि हरियाणा येथील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. याचे गांभीर्य शासनाने लक्षात घेतले पाहिजे; पण दुर्दैवाने या आंदोलनाची अशी नोंद घेतली नसल्याचे दिसून आले आहे. आता हे आंदोलन केवळ देहलीपुरते मर्यादित रहाणार नाही. देशभरातील शेतकरी यात सहभागी होतील आणि आपल्या पद्धतीने प्रश्न सोडवतील.’’
Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
धोकादायक इमारतीमधील रहिवास बंद करून त्या स्वतःहून पाडाव्यात !
बेदखल कुळांच्या प्रश्नाविषयी बविआचे लांजा तहसीलदारांना निवेदन
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप