कार्तिक शुक्ल पक्ष सप्तमी (२१.११.२०२०) या दिवशी सनातनचे सद्गुरु डॉ. वसंत आठवले यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने…

‘मी’पण नष्ट होणार असल्याने भगवंताशी एकरूप होण्याचे भय वाटणे
‘स्वतःचे ‘मी’पण नाहीसे करणे सर्वांत कठीण असते. कवीश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर यांनी एका कवितेत लिहिले आहे, ‘मी जन्मोजन्मी भगवंताचा शोध घेत होतो. एकदा भगवंताच्या दारी पोचलो. दार ठोठावणार इतक्यात घाबरलो; कारण भगवंताला भेटल्यानंतर माझा ‘मी’पणा नाहीसा होईल. मीच उरणार नाही तेव्हापासून मी भगवंताचा पत्ता ठाऊक असूनही ‘भगवंत नाही’, अशा ठिकाणी भगवंताचा शोध घेत भटकत असतो.’
– (सद्गुरु) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)
भक्त भगवान होतो कि दोघे विभक्तच रहातात ?
‘भक्ती हा अहंकार तोडण्याचा विधी, अभ्यास आहे; परंतु भक्तीमार्गांत द्वैत ठेवण्याची प्रथा आहे म्हणजे ‘भक्त नेहमी परमेश्वराच्या पायाशीच शरण असला पाहिजे’, असे सांगतात. याचे कारण अज्ञानी भक्ताला सांगितले की, तू भगवानच आहेस, तर त्याचा अहंकार वाढेल. प्रत्यक्षात मात्र भक्त भगवान होतो. भक्त असतांना तो अव्यक्त भगवानच असतो; परंतु भक्ताला ‘तू भगवान होऊच शकत नाहीस’, अशी खात्री पटली, तर तो तशा श्रद्धेमुळे भगवंताच्या पायाशीच अडकून पडेल, म्हणजे तो सलोक मुक्तीपर्यंतच पोचेल.’
– (सद्गुरु) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !