राज्यात आज रात्रीपासून १५ दिवस संचारबंदी लागू – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पुढचे १५ दिवस कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी (ब्रेक दि चेन) राज्यात १४४ कलम लागू करत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिलच्या रात्री केली. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.

अनिल देशमुख यांचे आज केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अन्वेषण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे १४ एप्रिल या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अन्वेषण करण्यात येणार आहे. देशमुख यांना अन्वेषणासाठी समन्स दिले आहे.

१४ एप्रिलच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री दळणवळण बंदीची घोषणा करण्याची शक्यता ! – राजेश टोपे

१४ एप्रिल या दिवशी होणार्‍या मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दळणवळण बंदीची घोषणा करण्याची शक्यता आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

दळणवळण बंदीच्या दिवसांच्या निश्‍चितीअभावी आज पुन्हा ‘टास्क फोर्स’ ची बैठक !

११ एप्रिल या दिवशी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ८ दिवसांची कडक दळणवळण बंदी असावी, असे मत मांडले, तर ‘टास्क फोर्स’ च्या सदस्यांनी दळणवळण बंदी १४ दिवसांची असावी, असे मत मांडले…..

११ एप्रिल या दिवशीच्या ‘टास्क फोर्स’ बैठकीनंतर दळणवळण बंदीचा निर्णय घेऊ ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

१० एप्रिल या दिवशी सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि अन्य राजकीय पक्ष यांच्या समवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांसह उपस्थित सर्वांनी दळवळणबंदीचे निर्बंध कडक करण्याला सहमती दर्शवली.

शासनाचे ‘जम्बो कोविड सेंटर्स’ खासगी रुग्णालयांनी दत्तक घ्यावेत ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘कोविड सेंटर्स’ मध्ये खासगी रुग्णालयातील डॉक्टर आल्यास उपचारासाठी साहाय्य होईल. महाराष्ट्र एकवटल्यावर तो जिंकतो. यामध्ये तुम्ही महत्त्वाचा दुवा आहात, असे खासगी रुग्णालयाच्या प्रतिनिधींना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले.

पुणे येथील दळणवळण बंदीच्या निर्णयाला व्यापारी संघटनांचा विरोध, मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र

राज्य सरकार पाठोपाठ पुणे महापालिकेने शहरात घोषित केलेल्या दळणवळण बंदीच्या निर्णयाचा येथील व्यापारी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे.

विरोधक वा तज्ञ यांचा दु:स्वास करून नाही, तर प्रत्यक्ष कृतीचे विवेचन कोरोना थांबवायला साहाय्यक ठरेल ! – देवेंद्र फडणवीस

मागील वर्षभरापासून आम्ही रस्त्यावरच आहोत. रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजावून सांगण्याची, त्यांच्या साहाय्याला धावून जाण्याची आमची सिद्धता आहे. तुलना केवळ परिस्थितीशी नको, तर सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे.

राज्य सरकार कोविड अल्प करण्यात नाही, तर लोकांना त्रास देण्यात गुंतलेले ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या भाषणात कोव्हिड का वाढत आहे ? तो आपल्या महाराष्ट्रातच का वाढत आहे ? त्यावर आम्ही काय उपाययोजना करतो आहोत, हे सांगण्याची आवश्यकता होती….

तज्ञांशी बोलून येत्या २-३ दिवसांत दळणवळण बंदीविषयीचा निर्णय घेणार ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

शासन जनतेच्या हितासाठीच पावले उचलत आहे; मात्र परिस्थिती अशीच राहिली, तर आहे ती परिस्थिती उघड्या डोळ्यांनी मी स्वीकारू शकत नाही. आता मी पूर्ण दळणवळण बंदीची चेतावणी देत आहे; मात्र आता दळणवळण बंदी घोषित करत नाही.