स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक सहकार्य करा ! – नरेंद्र पाटील, माथाडी कामगार नेते

दळणवळण बंदीच्या काळात गतवर्षी आणि आतासुद्धा जीव धोक्यात घालून राबणार्‍या माथाडी कामगारांविषयी मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेऊन त्यांना आर्थिक सहकार्य द्यावे

विरारमधील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा मृत्यू

वारंवार घडणार्‍या अशा घटना शासकीय यंत्रणांना लज्जास्पद ! गेल्या काही मासांत घडलेल्या अशा घटनांतून काहीही न शिकणार्‍या अन् रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या प्रशासनातील उत्तरदायींना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे….

अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाने डोळ्यांत तेल घालून काम करावे ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक येथील दुर्घटनेचे सखोल अन्वेषण करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश, प्रत्येक मृताच्या कुटुंबियांसाठी ५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित

राज्यात दळणवळण बंदी घोषित करण्याऐवजी निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दळणवळण बंदी घोषित करण्याऐवजी ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेच्या अंतर्गत राज्यशासन कोरोनाविषयक निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता आहे.

प्रशासनाने अनावश्यक रस्त्यावर फिरणार्‍या नागरिकांचा बंदोबस्त करावा ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या कडक निर्बंधाच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी सज्ज रहा ! – मुख्यमंत्री

कोरोनाच्या किती किती लाटा येतील ? ते आज सांगू शकत नाही; मात्र आता राज्यातील उद्योगांनीसुद्धा येणार्‍या लाटेला तोंड देण्याच्या दृष्टीने आवश्यक ते नियोजन आतापासूनच करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ एप्रिल या दिवशी केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली ! – चंद्रकांत पाटील, भाजप

रिक्शाचालक प्रत्येक मासात १० सहस्र रुपये कमवतात आणि त्यांना केवळ दीड सहस्र रुपये देऊन त्यांच्याही तोंडाला पाने पुसली आहेत. केवळ निर्बंध लादायचे आणि फारसे साहाय्यही करायचे नाही, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.’’

गरिबांना अर्थसाहाय्य करण्यासाठी कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी

नियम मोडल्यास स्थानिक प्रशासनाने सुविधा बंद कराव्यात ! – मुख्यमंत्री

जीवनावश्यक आणि आवश्यक सेवा सुविधा बंद केलेल्या नाहीत. याचा अर्थ तिथे नियम मोडले जात आहेत किंवा गर्दी होत आहे, असे दृश्य दिसता कामा नये, अन्यथा त्या सुविधा स्थानिक प्रशासनाने बंद कराव्यात, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

राज्यात आज रात्रीपासून १५ दिवस संचारबंदी लागू – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पुढचे १५ दिवस कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी (ब्रेक दि चेन) राज्यात १४४ कलम लागू करत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिलच्या रात्री केली. फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला.