पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला करवसुलीसाठी पाठवलेल्या नोटिसीला स्थगिती

श्रीमंत, मध्यमवर्गीय किंवा सामाजिक संस्था कोणीही कर चुकवला तरी चूकच नव्हे का ?

आमदार-खासदारांच्या संस्थाच जिल्हा बँकेचे मोठे थकबाकीदार

जिल्हा बँकेची थकबाकी वाढतच असून आमदार-खासदारांच्या संस्थांकडे अनुमाने १ सहस्र कोटींची कर्जे आणि थकबाकी आहे. हा आकडा वाढत असतांना कारभार्‍यांनी वसुलीकडे कानाडोळा केला आहे.

कोरोना योद्ध्यांचे अपघाती विमा प्रस्ताव मनपा प्रशासनाने नाकारले

कठीण काळात जिवाची पर्वा न करता सेवेत प्राण गमावणार्‍या कर्मचार्‍यांच्या वारसांनी काय करावे ? किरकोळ कारणे देऊन कर्मचार्‍यांचे प्रस्ताव नाकारणार्‍या प्रशासनाला कर्मचार्‍यांकडून पैशांची अपेक्षा आहे, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?

सर्व शाळा-महाविद्यालयांत हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाचा विषय पोचवतो ! – शिक्षणाधिकारी आर्.डी. शिंदे, जत

आपली महान भारतीय संस्कृती बाजूला ठेवून भारतीय अकारण पाश्‍चिमात्य संस्कृतीचे आचरण करत आहेत. तुमचा उपक्रम चांगला असून सर्व शाळा-महाविद्यालये येथे विषय पोचवतो, असे आश्‍वासन शिक्षणाधिकारी आर्.डी. शिंदे यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोरया गोसावींना दिली होती ९२ एकर इनामी भूमी !

छत्रपती शिवरायांच्या दुर्मिळ पत्रांतून ते साधू-संतांचा योग्य सन्मान करायचे, हे पुन्हा एकदा सिद्ध ! आजचे राजकारणी हिंदु संतांवर टीका-टिप्पणी करतात, शंकराचार्य यांच्यासारख्या हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंना विनाकारण कारागृहात डांबतात !

माता-पित्यांना न सांभाळणार्‍या वाशिम जिल्हापरिषदेतील कर्मचार्‍यांना ३० टक्के रक्कम माता-पित्यांच्या खात्यांत जमा करावी लागणार !

वाशिम जिल्हा परिषदेने घेतलेला स्तुत्य निर्णय !

नागपूर येथे दादागिरी करणार्‍या गुंडाची जमावाने केली दगडाने ठेचून हत्या !

शहरातील नारायण पेठ परिसरात गुंड विजय वागधरे याच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त लोकांनी त्याची ७ फेब्रुवारीच्या रात्री दगडाने ठेचून हत्या केली.

मुंबई येथे २ अमली पदार्थ तस्करांना एन्.सी.बी.कडून अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एन्.सी.बी) येथील जोगेश्‍वरी परिसरातून इब्राहिम मुजावर उपाख्य इब्राहिम कासकर आणि आसिफ राजकोटवाला या २ अमली पदार्थ तस्करांना ७ फेब्रुवारी या दिवशी अटक केली आहे. एन्.सी.बी.ने या आरोपींकडून चारचाकीही हस्तगत केली आहे.

रोहिंग्या घुसखोरांना बांगलादेशाने थारा न दिल्याने भारतानेही त्यांना सामावून घेऊ नये !- सूर्यकांत केळकर, संस्थापक आणि राष्ट्रीय संघटन मंत्री, भारत रक्षा मंच

बांगलादेशी घुसखोरी विरुद्ध भारत रक्षा मंचाने काम चालू केले. आसाममध्ये एन्.आर्.सी. (राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया) च्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करून सरकारने ती प्रकिया संपूर्ण देशात लागू करावी आणि घुसखोरांना देशातून बाहेर काढावे.

मनपाचे कर्मचारी असल्याचे सांगून ब्रिटीशकालीन वडाचे झाड कापले

महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगून भरदिवसा अपप्रकार करण्याचे धारिष्ट्य करणार्‍यांवर कठोर कारवाई केली, तरच इतरांना जरब बसेल !