शासनाकडून महाराष्ट्रात उभारण्यात येणारी ‘चक्रीवादळ निवारा केंद्रे’ कागदावरच !

कामाची समयमर्यादा संपूनही निविदा प्रकियेतच काम रखडले ! चक्रीवादळामध्ये होणारी जीवित आणि वित्त हानी टाळण्यासाठी या संवेदनशील प्रश्‍नाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, ही अपेक्षा !

कामाच्या वेळी केस विंचरायला जाणे, हा गंभीर गैरवर्तनाचा प्रकार !

‘रंगाराव यांनी काम चालू करण्याऐवजी वरिष्ठांना शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली, हेसुद्धा गैरवर्तनच आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने रंगाराव यांची याचिका फेटाळली.

मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमधून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा निर्णय लवकरच घेण्यात येईल ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री

राज्यातील पदवी महाविद्यालये चालू झाली, तरी विद्यार्थ्यांना अद्यापही उपनगरी गाड्यांतून प्रवास करण्याची अनुमती देण्यात आलेली नाही.

सांगली जिल्ह्यात २३ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

विविध आंदोलने आणि आगामी सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगली जिल्ह्यात ९ ते २३ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश घोषित केला आहे.

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे भाजपच्या नेत्याला काळे फासणार्‍या २५ शिवसैनिकांवर गुन्हा नोंद

वीजदेयक वसुलीविरुद्ध आंदोलनात भाजप नेते शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी कटेकर यांच्या तोंडाला काळे फासले होते.

११ फेब्रुवारीपासून दादर-म्हैसुरू साप्ताहिक एक्सप्रेस चालू

दादर-म्हैसुरू साप्ताहिक एक्सप्रेस ११ फेब्रुवारीपासून दादर येथून, तर १४ फेब्रुवारीपासून म्हैसुरू येथून चालू होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून उत्तर आणि दक्षिण भारतात टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक चालू करण्यात येत आहे.

आतापर्यंत राज्यातील ५ लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोनावरील लस देण्यात आली ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

राज्यात प्राधान्यक्रम ठरलेल्या व्यक्तींना कोरोनावरील लस देण्याची प्रक्रिया चालू आहे. ६५२ केंद्रांवर ही लस दिली जात आहे.

कटाच्या बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी सैन्याने अनुमती दिली असल्याविषयी न्यायालयाने ले. कर्नल पुरोहित यांच्याकडे मागितले पुरावे

मालेगाव येथे बॉम्बस्फोटाच्या कटाच्या बैठकीला सैन्याच्या आदेशावरून गुप्तवार्ता मिळवण्यासाठी उपस्थित असल्याची स्वत:ची बाजू कर्नल पुरोहित यांनी न्यायालयात मांडली आहे.

देहलीतील शेतकर्‍यांना चर्चा नाही, तर तमाशा करण्यातच रस ! – पाशा पटेल

सरकार सर्व मागण्यांवर चर्चा करायला सिद्ध असतांना शेतकर्‍यांनी आडमुठे धोरण ठेवले आहे. त्यांना प्रश्‍न सोडवून घ्यायचे नाहीत, त्यांना तमाशा करण्यात रस आहे, अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.

आज कोल्हापुरात दुर्ग परिषद ! – सुखदेव गिरी

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने किल्ले रायगडनंतर होणार्‍या या परिषदेत दुर्ग अभ्यासकांनी केलेले काम, विविध माहितीचे संकलन, दुर्लक्षित गडांविषयीची माहिती आदींविषयी ऊहापोह होणार आहे.