पुन्हा हिंदु राजेशाही !

लोकशाही स्थापन होऊन अवघी काही वर्षेच झाली असतांना आता नेपाळी हिंदूंनी देशात पुन्हा केवळ राजेशाही स्थापित करण्याची नव्हे, तर नेपाळला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे जनआंदोलने केली जात आहेत आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा थोडासा अभाव आहे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राहुल गांधी यांच्याविषयी काही प्रश्‍न आहेत. त्यांच्या कामात सातत्याचा थोडासा अभाव आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले. या वेळी ‘देशात राहुल गांधी यांचे नेतृत्व मानायला सिद्ध आहात का ?’ या दर्डा यांच्या प्रश्‍नावर शरद पवार यांनी वरील उत्तर दिले.

पदवीधर निवडणुकीच्या मूळ संकल्पनेस हरताळ !

या मतदारसंघात पक्षांचे राजकीय कार्यकर्तेच आमदार होणार असतील, तर वेगळे मतदारसंघ कशासाठी ? विधान परिषदेत बहुसंख्य आमदार पदवीधर असतांना आणि अगदी ग्रामीण भागातही पदवीधर मतदार संख्या वाढलेली असतांना या मतदारसंघाचे औचित्य काय ?

मी हिंदु, धर्माचा प्रश्‍न येईल तेव्हा धर्माच्या बाजूने बोलेन !

मी कर्माने आणि धर्मानेही हिंदु आहे. हिंदुत्व हा माझ्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. मी हिंदु धर्माविषयी बोलू शकते; मात्र आतापर्यंत बोलण्याची आवश्यकता भासली नाही; मात्र जेव्हा धर्माचा प्रश्‍न येईल, तेव्हा हिंदु धर्माच्या बाजूने बोलेन, असे वक्तव्य अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केले.

भाग्यनगरचे रणांगण !

काँग्रेसने ७० वर्षे मुसलमानांना वापरले आणि आता ‘एम्.आय.एम्., तेलंगाणा राष्ट्र समिती आदी पक्षही केवळ स्वतःच्या राजकीय तुंबड्या भरून घेत आहोत’, हे त्यांना कळेपर्यंत कदाचित् त्यांचे अधिक पतन झालेले असेल. कसेही असले, तरी यंदाची निवडणूक एम्.आय.एम्. आणि तेलंगाणा राष्ट्र समिती यांना कठीण जाणार आहे, हे निश्‍चित !

गुरु आणि शनि ग्रहांच्या युतीमुळे राजकीय पक्ष अन् संघटना यांमध्ये फूट पडण्याची शक्यता

भारतावरही याचा परिणाम होणार आहे. यामुळे आगामी कालावधीत समान नागरी कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व सुधारणा कायदा यांसारखे विषय पुन्हा ऐरणीवर येऊ शकतात. यामुळे पुन्हा एकदा मोठे जनआंदोलन पेटू शकते.

महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर मनसे आणि भाजप यांची टीका

महाविकास आघाडीची वर्षपूर्ती म्हणजे केवळ दिखावा आहे. या सरकारला राज्याचा विकास करायला जमलेले नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. रोजगार, नोकर्‍या यांचा प्रश्‍न आहे. विकासाच्या संदर्भात शून्य प्रगती असून कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे

‘लव्ह’ आणि ‘जिहाद’ हातात हात घालून चालू शकत नाही ! – तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ

नुसरत जहाँ यांना जे वाटते ते सत्य असते, तर चांगलेच झाले असते; मात्र वस्तूस्थिती तशी नाही, याचा त्यांनी अभ्यास करावा !

डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर पराभव मान्य करत सत्तांतरणाच्या प्रक्रियेला दिली अनुमती !

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव न स्वीकारणारे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर पराभव स्वीकारत सत्तेचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया चालू करण्यास अनुमती दिली आहे.

बंगालमध्ये भाजप महिला नेत्याच्या वाहन ताफ्यावर आक्रमण

भाजपच्या नेत्या भारती घोष यांचा वाहनताफा तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अडवून आक्रमण केले, असा आरोप घोष यांनी केला.