सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक चालू 

कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथील पूल अतीवृष्टीमुळे बंद करण्यात आला होता; मात्र आता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत् चालू करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का

हा धक्का ३.० रिश्टर स्केलचा असल्याने या परिसरात कोणत्याही प्रकारची जीवित आणि वित्त हानी झाली नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सिंधुदुर्ग : महावितरणच्या इन्सुली उपकेंद्रात बिघाड झाल्याने २५ गावे अंधारात !

येथे झालेला बिघाड दुरुस्त करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंत्यांनी दिली.

जलमय परिस्थितीमुळे कल्याण येथील १ सहस्र कुटुंबांचे स्थलांतर !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक, अग्निशमन दलाचे जवान यांनी हे स्थलांतर केले. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी रात्री स्थलांतरितांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने त्यांची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.

सिंधुदुर्ग : दिगशी-तिथवली मार्गावरील लहान पूल (कॉजवे) पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांची असुविधा

नवीन काम करण्यापूर्वी या ‘कॉजवे’ची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती; परंतु मागणीकडे दुर्लक्ष करून त्याच उंचीचा ‘कॉजवे’ बांधला. त्याचा नाहक त्रास आता सर्वांना सहन करावा लागत आहे.

गोवा : भारतीय तटरक्षक दलाचे संशोधन नौकेवर यशस्वी बचावकार्य : ३६ जणांचे प्राण वाचवले

प्रचंड कौशल्य आणि दृढ निश्चयाने आयसीजीएस् सुजीतने ‘सिंधु साधना’ नौकेला यशस्वीरित्या ‘टोईंग’ केले. दोन्ही नौका गोव्याच्या दिशेने मार्गस्थ झाल्या असून २८ जुलै या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत त्या मुरगाव बंदरावर पोचण्याची अपेक्षा आहे.

गोवा : दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक २९ जुलैनंतर पूर्ववत् होणार

रेल्वेमार्गावर पडलेली दरड हटवून रेल्वेमार्ग आणि सेवा पूर्ववत् चालू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असले, तरी अर्धाअधिक बोगदा मातीने भरला असल्यामुळे रेल्वेसेवा पूर्ववत् होण्यास आणखी २ दिवस थांबावे लागणार !

जळलेल्या वनक्षेत्रात भूरूपांतर कदापि नाही ! – वनमंत्री विश्वजीत राणे

डोंगरमाथ्यावर आग लागल्यास ती विझवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत ? आगीची संभाव्य स्थळे निश्चित केली आहेत का ? आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली भूमी बांधकाम व्यावसायिकांच्या घशात जाऊ नये, यासाठी कोणती काळजी घेणार आहात ?

धरणाला कोणताही धोका नाही ! – कार्यकारी अभियंता गणेश सलगर

या माती धरणाची लांबी २१० मीटर असून उंची १५.५६ मीटर आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा १.९२८ द.ल.घ.मी. इतका आहे. वर्ष १९८३ मध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा ०.५८७ द.ल.घ.मी. आहे. सद्या धरणामध्ये ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ गावे पूरग्रस्त : २३२ नागरिकांचे स्थलांतर

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात २७ जुलैपर्यंत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.