उद्योगपती अदानी शरद पवार यांच्याकडे येऊन गेल्यानंतर सरकारने वीज देयक माफ न करण्याचा निर्णय घेतला !

वीज देयक माफ न करण्याचा निर्णय वीज आस्थापनांसमवेत चर्चा झाल्याशिवाय झाला नसेल. काही तरी लेनदेन झाल्याशिवाय हे झाले नसेल. सर्व आस्थापनांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोपही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी केला.

मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला ८ मार्चपासून प्रारंभ होणार

ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातूनच होणार असल्याचेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. ८ मार्च ते १८ मार्च या कालावधीत ही सुनावणी पार पडणार आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपवण्यासाठी नियम पाळणे आवश्यक ! – उद्धव ठाकरे

राज्यात अनुमाने ३ लाख ५० सहस्र कोरोनाचे लसीकरण झाले आहे. ब्रिटन, ब्राझील या देशात ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत, ते पहाता लोकांनी बेसावध न रहाता अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले.

१५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीच्या अटीवर राज्यातील महाविद्यालये चालू करण्यात येतील ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

कोरोनामुळे वर्षातील महाविद्यालयाच्या एकूण दिवसांपैकी ७५ टक्के दिवस महाविद्यालयात उपस्थित रहाण्याची अट शिथिल करण्यात आली आहे.

देहलीऐवजी चीनच्या सीमेवर खिळे ठोकले असते, तर चीनने घुसखोरी केली नसती ! – संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्‍वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. त्यांच्या लढ्याला बळ देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

हिंदु काय रस्त्यावर पडले आहेत का ? – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि कायदा अन् सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करण्यासाठीच ही परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याला अनुमती दिल्याने सरकारच्या मर्जीने हिंदूंच्या विरोधात बोलले जात आहे, असेच आम्हाला वाटते.

(म्हणे) ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे !’

एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याची हिंदुद्वेषी गरळओक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कोणीही येऊन हिंदूंची अपकीर्ती करून जातो आणि त्याच्यावर कारवाई होत नाही, हे संतापजनक नाही का ?

कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गुलबर्गा-सोलापूर एस्.टी. गाडीवर कन्नड पोस्टर लावले !

कन्नड संघटनांचा मराठीद्वेष ! शासनकर्त्यांनी सीमाप्रश्‍न न सोडवल्याने निर्माण झालेला जटील प्रश्‍न !

गूगल भाषांतराच्या मर्यादेमुळे भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर खासदार रक्षा खडसे यांचा नावाचा आक्षेपार्ह अर्थ !

गृहमंत्र्यांच्या पोस्टवर रक्षा खडसे म्हणाल्या, त्यांनी आक्षेपार्ह उल्लेखाची नोंद घेतली, ही चांगली गोष्ट आहे; मात्र त्यांनी ती पोस्ट इतरांना पाठवायला नको होती.

कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जोपर्यंत हे प्रकरण न्यायालयात आहे, तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित का केला जाऊ नये ? जोपर्यंत निकाल लागत नाही, तोपर्यंत आपल्या सरकारने हा भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी न्यायालयात केली पाहिजे.