विरोधकांचा गदारोळ

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – बुलढाणा जिल्ह्यातील चिखली गावातील अनुराधा नागरी सहकारी बँकेमध्ये वर्ष २००६-०८ या कालावधीत राज्य आणि केंद्र शासनांकडून कर्ज वाटपासाठी एकूण ३ कोटी २४ लाख रुपयांचा निधी वितरीत केला होता; मात्र या बँकेने खोटी कर्ज खाती दाखवून २ कोटी ३७ लाख रुपयांचा अपहार केला आहे. चौकशी समितीनेही तसाच खोटा अहवाल सिद्ध केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर फौजदारी कारवाई करून २ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम वसूल करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत केली.
Dev_Fadnavis: 8 लाखाच्या ऐवजी अडीच कोटी रुपये वसूल करणाऱ्या बँकेवर कारवाई का होत नाही?
शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांना राज्य सरकारचे अभय का?#BudgetSession pic.twitter.com/uOjkz7mEzV— Devendra Fadnavis Fan (@Dev_Fadanvis) March 10, 2021

या वेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न दिल्याने विरोधकांनी सभागृहात गदारोळ घातला. भाजपच्या आमदार श्रीमती श्वेता महाले यांनी प्रश्नोत्तराच्या घंट्यांत हा प्रश्न विचारला होता.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !