
मुंबई, १० मार्च (वार्ता.) – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर ‘हेलिपॅड’ आहे; पण त्याच्या वापरास अनुमती मिळत नाही, तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानी यांच्या आस्थापनांचे भाग (शेअर्स) बाजारात घसरत असल्याने त्यांची मोठी आर्थिक हानी होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून ‘हेलिपॅडला’ ही अनुमती मिळावी, यासाठी भाजपनेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी १० मार्च या दिवशी पत्रकारांशी बोलतांना केला.
“Are #BJP-Ambani Misleading Country?”: Congress’ Nana Patole Raise Doubts Over Ambani Bomb Scare | HW English #MukeshAmbani #NanaPatole https://t.co/Xb9VaIDVlv
— HW News English (@HWNewsEnglish) March 10, 2021
पटोले पुढे म्हणाले की, अंबानी यांच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावर जिलेटिनच्या कांड्या असलेले वाहन सापडले. अंबानी यांना केंद्र सरकार, राज्य सरकार, तसेच त्यांची वैयक्तिक सुरक्षा व्यवस्था असतांना ते वाहन तेथेपर्यंत पोचलेच कसे ? वर्ष २००९ मध्ये अनिल अंबानी यांच्या ‘हेलिकॉप्टर’मध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात ज्याचे नाव समोर आले, त्याचा मृत्यू दुसर्याच दिवशी झाला होता.
धर्माचरणानेच ‘लव्ह जिहाद’ला आळा घालणे शक्य ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
देशात ७६ ते ८० दिवसांचा इंधन साठा शेष ! – पेट्रोलियम मंत्री
खंडणीच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा सब्यसाची दत्ता यास अटक
तृणमूल काँग्रेसचा नेता अब्दुल अलीम अलराजी यास अटक
8 Workers Die : विशाखापट्टणम् : कारखान्यात वितळलेले अतीउष्ण स्टील पडून ८ कामगारांचा मृत्यू
Bangladeshi Infiltrators In Mumbai : मुंबईत पैसे घेऊन बांगलादेशी घुसखोरांना अभय !