भाववृद्धी सत्संगाची परिणती साधकांत दिसू दे ।
या भाववृद्धी सत्संगाची परिणती साधकांत दिसू दे ।
देव आला आहे तारण्या, साधकांना कळू दे ॥
या भाववृद्धी सत्संगाची परिणती साधकांत दिसू दे ।
देव आला आहे तारण्या, साधकांना कळू दे ॥
सद्गुरु सिरियाकदादांकडून साधकांवर चैतन्याचा वर्षाव होत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांकडूनच हे चैतन्य येत असून ते अंतर्मनापर्यंत पोचत आहे, असे मला जाणवले.
संतांच्या सत्संगानंतर साधिकेने रात्री झोपण्यापूर्वी अंगावरचे कपडे पालटले नाहीत. त्या वेळी ‘संतांच्या चैतन्याने ते कपडे भारित झाले असल्यामुळे माझ्यावर आध्यात्मिक उपाय होतील’, असा तिचा भाव होता.
‘योग: कर्मसु कौशलम् ।’ प्रथमोपचार प्रशिक्षण हा उपक्रम ज्ञान, भक्ती अन् कर्म या मार्गांचा त्रिवेणी संगम आहे – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
‘ईश्वरप्राप्तीसाठी तन-मन-धनाचा त्याग करायचा असतो. त्यामुळे आयुष्य धन मिळवण्यात फुकट घालवण्यापेक्षा सेवा करून धनाबरोबर तन आणि मन यांचाही त्याग केला, तर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’
आता काळाच्या दृष्टीने विचार करता भीषण आपत्काळ समोर उभा ठाकला आहे. भयाण अशा आपत्काळाला तोंड देतांना आपल्याच जीविताची शाश्वती नसल्याने विवाह करून नवीन दायित्व स्वीकारणे, हे अयोग्य ठरू शकते.
सध्या आपत्काळास प्रारंभ झाला आहे. या आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताची भक्ती करणे आवश्यक आहे. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून शुद्ध मनाने भक्ती म्हणजेच साधना केली पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.
‘एकदा साहित्यसम्राट न.चि. केळकर प.पू. गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनास गेले होते. प.पू. महाराजांसमोर गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, प.पू. महाराजांच्या दर्शनास येणार्या प्रत्येकाला ते नामाचा महिमा सांगून नामजप करायला सांगत; परंतु ते स्वतः मात्र कधी नाम घेतांना दिसले नाहीत.
राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीने सध्या आपत्काळ चालू आहे. वाढत्या नैसर्गिक आपत्ती, देशद्रोही आणि धर्मद्रोही यांचे वाढते बळ, राजकीय अस्थिरता, तसेच समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात वाढत असलेल्या अडचणी ही सर्व आपत्काळाची भौतिक लक्षणे आहेत.
पू. आजींच्या खोलीत साधिका सायंकाळी नामजपाला बसतात. मला पू. आजींची आठवण आली; म्हणून मी त्यांना भेटायला त्यांच्या खोलीत गेले. त्या वेळी दरवाजा उघडल्यावर मला पुष्कळ सुगंध आला आणि ‘खोलीत पुष्कळ फुले आहेत’, असे मला वाटले.