लोक मांसाहार करत असल्याने हिमाचल प्रदेशमध्ये होत आहे ढगफुटी आणि भूस्खलन !

मंडी (हिमाचल प्रदेश) येथील आयआयटीचे संचालक लक्ष्मीधर बेहरा यांचा दावा  !

हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३३० लोकांचा मृत्यू

भूस्खलनामुळे ९ सहस्र घरांना तडे
१० सहस्र कोटी रुपयांची हानी

हिमाचल प्रदेशात हाहा:कार : आतापर्यंत ६० हून अधिक लोक मृत्यूमुखी !

गेल्या ४-५ दिवसांपासून पहाडी राज्ये असलेल्या हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले असून आणखी २ दिवस मुसळधार पाऊस चालू राहील, अशी चेतावणी हवामान खात्याने दिली आहे.

चीनच्या शिआन भागात पूर : २१ जण मृत्यूमूखी

या पुरात काही घरे वाहून गेली आहेत. यासह रस्ते, पूल, वीजपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधा यांची बरीच हानी झाली आहे.

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती

राज्यातील सध्याची हवामान परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस मुख्यालयाने स्थानिक लोक आणि पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी सतर्कतेची सूचना जारी केली आहे. 

सिंधुदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक चालू 

कोल्हापूर जिल्ह्यातील बालिंगा येथील पूल अतीवृष्टीमुळे बंद करण्यात आला होता; मात्र आता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने वाहतूक पूर्ववत् चालू करण्यात आली आहे.

जलमय परिस्थितीमुळे कल्याण येथील १ सहस्र कुटुंबांचे स्थलांतर !

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आपत्कालीन पथक, अग्निशमन दलाचे जवान यांनी हे स्थलांतर केले. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी रात्री स्थलांतरितांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने त्यांची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या.

चांदेराई आणि हरचिरी येथील पूर ३६ तासांनी ओसरला : जनजीवन पूर्वपदावर

दोन दिवस मुसळधार पडलेल्या पावसाने आज विश्रांती घेतल्याने तालुक्यातील चांदेराई, हरचिरी, तोणदे, टेंभ्ये, पोमेंडी, सोमेश्वर आदी भागांतील पुराचे पाणी ओसरल्यामुळे येथील जनजीवन पूर्वपदावर चालू झाले आहे.

सिंधुदुर्ग : दिगशी-तिथवली मार्गावरील लहान पूल (कॉजवे) पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थांची असुविधा

नवीन काम करण्यापूर्वी या ‘कॉजवे’ची उंची वाढवण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती; परंतु मागणीकडे दुर्लक्ष करून त्याच उंचीचा ‘कॉजवे’ बांधला. त्याचा नाहक त्रास आता सर्वांना सहन करावा लागत आहे.