दूध मापनासाठी १० ग्रॅम मापनाचे अचूक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याचे आदेश !

सध्याचे इलेक्ट्रॉनिक काटे हे १०० ग्रॅमची अचूकता दर्शवतात. यामुळे शेतकर्‍यांची आर्थिक हानी होते. यावर दूध मापनासाठी १० ग्रॅम मापनाचे अचूक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याचे आदेश वैधमापन शास्त्र विभागाने नुकतेच दिले.

‘मागणी तसा पुरवठा’ यावर आधारित शेतीत निश्चित यश मिळते ! – प्रकाश आवाडे, आमदार

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शेतकरी आघाडी, ‘नेचर केअर फर्टिलायझर विटा’ (जिल्हा सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण शेतकरी मेळाव्याचे विश्वपंढरी सभागृह, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले होते.

दहिवडी (जिल्हा सातारा) कृषी कार्यालय शेतकर्‍यांसाठी ‘असून अडचण नसून खोळंबा’ !

एवढ्या असुविधा आणि असंवेदनशील कर्मचारी असलेले कृषी कार्यालय कधी शेतकर्‍यांना साहाय्यभूत ठरू शकेल का ? संबंधित अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन कधी प्रयत्न करणार ?

‘अर्जुना रिव्हरसाइड फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.’ची स्थापना !

शेतकर्‍यांची उन्नती होण्याच्या दिशेने प्रत्यक्षात काहीच होतांना दिसत नाही, ही वस्तूस्थिती आहे. यावर उपाय म्हणजे शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन स्वतःच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे. याच उद्देशाने कोकणातील राजापूर तालुक्यातील तळवडे येथे ‘अर्जुना रिव्हरसाइड फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.’ची स्थापना करण्यात आली आहे.

परतीच्या पावसाने झालेल्या हानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

जे लोकांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित आहे, ते सरकार घेत आहे. याची कार्यवाही तात्काळ होत आहे. शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे थेट त्यांच्या अधिकोषात जमा होत आहेत. दीपावलीच्या कालावधीत परतीच्या पावसाचा फटका शेतकर्‍यांना बसला आहे. याचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत.

पावसाने मराठवाड्यातील शेतकर्‍यांची मोठी हानी !

पावसाचा मोठा फटका मराठवाड्याला बसला आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यांतील शेतकर्‍यांची मोठी हानी झाली आहे. शेतातील उभ्या पिकांत पाणी साचले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीची घोषणा !

पावसाने शेतीची पुष्कळ हानी झाली असून उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकर्‍यांसाठी उद्भवलेली ही बिकट स्थिती पहाता भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाची हानी !

सांगली जिल्ह्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो पिकाची मोठी हानी झाली आहे. वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव यांसह अन्य तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पाण्याखाली गेली आहे. टॉमेटोची पिके आडवी झाल्याने शेतकर्‍यांची लाखो रुपयांची हानी झाली आहे.

शेतकरी साहाय्यापासून वंचित राहिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील !

आतापर्यंत पिकांची हानी झाल्यानंतर हानीभरपाई देणार्‍या विमा आस्थापनांकडून शेतकर्‍यांची अनेक वेळा फसवणूक करण्यात आली आहे. तरीही सरकार आस्थापनांच्या व्यवस्थापकांवर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे या आस्थापनांचे फावते आणि ते वारंवार शेतकर्‍यांची फसवणूक करतात.

नंदुरबार येथे पोलिसांकडून ८ लाखांची गांजा शेती उद्ध्वस्त !

या शेतात अनुमाने ११३ किलोग्रॅम वजनाची ७ लाख ८६ सहस्र ३३१ रुपये किमतीची एकूण १५० गांजाची झाडे होती. या प्रकरणी पोलिसांनी शहादा पोलीस ठाण्यात गणेश भोसले  यांच्यावर गुन्हा नोंद केला असून सध्या ते पसार आहेत.