
नागपूर, २७ डिसेंबर (वार्ता.) – शेतकर्यांना पीकहानी भरपाई तातडीने मिळावी, यासाठी पंचनामे तातडीने होणे आवश्यक आहे. पंचनामे लवकरात लवकर व्हावे, यासाठी भ्रमणभाषद्वारे ‘ई-पंचनामे’ करण्याचे ‘ॲप’ विकसित करण्याचे काम चालू आहे. भविष्यात शेतीच्या हानीचे भ्रमणभाषद्वारे ‘ई-पंचनामे’ करण्यात येतील, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी २७ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. आमदार दीपक चव्हाण यांनी पावसामुळे हानी झालेल्या पिकांना हानी भरपाई मिळावी, यासाठी सभागृहात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर मंत्री देसाई यांनी उत्तर दिले.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक