२३ वर्षे अखंड व्रत जपत ‘पितांबरी परिवारा’चे सेवापथक विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी मार्गस्थ !
‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले; तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा’ या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या वचनाचा आणि हिंदु संस्कृतीतील ‘अतिथी देवो भव ।’ या मूल्याचा आदर्श प्रत्यय ‘पितांबरी परिवारा’च्या वतीने दिला जात आहे.