भक्त आणि भक्ती हा समान धागा सूत्र असून संत हे मेरुमणी असणे !

‘पंढरपूर, श्री विठ्ठल, श्री रुक्मिणी, एकादशी आणि वारी यांची एक विशिष्ट सांगड आहे. या सर्वांत एक समान धागा आहे की, ज्यामुळे एक सुंदर पुष्पमाळ सिद्ध होते. माळेला मणी असतात आणि ते एका सूत्रात गुंफतात. त्याप्रमाणे भक्त आणि भक्ती हा समान धागा सूत्र असून संत हे मेरुमणी आहेत.

देवद, पनवेल येथील श्रीमती स्मिता नवलकर (वय ७१ वर्षे) यांच्याकडील ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य आणि आध्यात्मिक संशोधन’ या ग्रंथात झालेले पालट !

जून-जुलै २०२२ या मासांपासून मला होणार्‍या पोटाशी संबंधित त्रासांमध्ये वाढ झाली. सप्टेंबर २०२२ मध्ये माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हा ग्रंथ रुग्णालयातही माझ्या समवेत होता. गेल्या जूनपासून यातून पुष्कळ चैतन्य आणि प्रकाश प्रकाशित होतो. त्याचा रंग हळूहळू फिकट होतो.

प.पू. भक्तराज महाराज यांनी भक्तीभावाने भरवलेला पेढा प्रत्यक्ष ग्रहण करणार्‍या पांडुरंगाचे भक्तवात्सल्य !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज एकदा त्यांच्या भक्तांसह पंढरपूर येथे गेले होते. रात्री १० वाजता प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले.

स्वतःमध्ये श्रद्धा आणि भाव वाढवण्यासाठी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सुचवलेल्या काही स्वयंसूचना !

देवाच्या कृपेने जग पुष्कळ सुंदर आहे आणि मी या सुंदरतेचा आनंद घ्यायला आलो आहे.

ईश्वरापर्यंत नेणारी सर्वश्रेष्ठ नवविधा भक्ती !

एके दिवशी हिरण्यकश्यपूने त्याच्या पुत्राला मांडीवर घेऊन विचारले की, बाळ प्रल्हादा, इतके दिवस तू गुरुजींकडून जे ज्ञान प्राप्त केलेस त्यांपैकी काही चांगल्या गोष्टी मला सांग. तेव्हा प्रल्हाद म्हणाला, ‘‘भगवान विष्णूंच्या भक्तीचे ९ प्रकार आहेत’’, असे म्हणून त्याने नवविधा भक्तीचे प्रकार हिरण्यकश्यपूला सांगितले. श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ।। अर्थ : … Read more

भाव म्हणजे काय ?

संत नामदेव खरोखरच प्राणत्‍याग करण्‍यासाठी निघाल्‍यावर मूर्तीतून पांडुरंग अवतरित झाले. नामदेवाच्‍या भक्तीपायी देवाला प्रगट व्‍हावे लागले आणि नैवेद्य ग्रहण करावा लागला.

भावसूचना

‘प्रत्येक कृती भावाला जोडून भावपूर्ण केल्यावरच माझ्यातील ‘मी’चे, म्हणजे अहंचे प्रमाण न्यून होऊन माझा भाव वाढणार आहे. त्यामुळे मला ईश्वराचे अस्तित्व जाणवणार आहे’, हे लक्षात घेऊन मी प्रत्येक कृतीला भाव जोडून ती भावपूर्ण करीन.’

सद्गुरूंचे माहात्म्य !

तुम्ही अद्वैत सिद्धांत प्रस्थापित करण्याचे व्रत घेतले आहे, तर हा द्वैताचा संभ्रम तुमच्या मनामध्ये कशाला ?

रामभक्त भरत !

भरताच्या नेतृत्वातही प्रजेने १४ वर्षे रामराज्याचीच अनुभूती घेतली. प्रभु श्रीराम अयोध्येत परतल्यावर भरताने श्रीरामाच्या चरणी राज्य पुन्हा अर्पण केले आणि श्रीरामाच्या आज्ञेनुसार राज्यातील कर्तव्ये केली.