
इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत प.पू. भक्तराज महाराज एकदा त्यांच्या भक्तांसह पंढरपूर येथे गेले होते. रात्री १० वाजता प.पू. बाबा पांडुरंगाच्या समोर उभे राहिले. बाबांनी पांडुरंगाच्या गळ्यात हार घातला आणि पेढ्याच्या पुडीतील एक पेढा उचलून पांडुरंगाच्या मुखाला लावला. तेव्हा तो गायब झाला. बडव्यांनी तेथील सर्व हार दूर केले. त्यांना पेढा कुठेही मिळाला नाही. बाबांनी पांडुरंगाच्या चरणांना स्पर्श केला, तेव्हा त्यांना उजव्या चरणाजवळ अर्धा पेढा मिळाला. प.पू. बाबा भक्तांना म्हणाले, ‘‘आनंदाश्रू ‘गुरुमाऊलीने प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन घडवले आणि मी पांडुरंगाला पेढा भरवला’, या विचाराने, तर दुःखाश्रू ‘परमेश्वराला पाषाणातून प्रत्यक्ष यायला किती कष्ट पडले असतील’, या विचाराने आले. (संदर्भ : sanatan.org)
धर्मशास्त्र काय सांगते ?
नामजपाचे महत्त्व !
मोरगाव (पुणे) येथे ‘हरि ॐ तत्सत्’ परिवार, फोंडशिरस (ता. माळशिरस) यांच्याकडून ३३ आदर्श माता-पित्यांचा सत्कार !
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !