
‘पंढरपूर, श्री विठ्ठल, श्री रुक्मिणी, एकादशी आणि वारी यांची एक विशिष्ट सांगड आहे. या सर्वांत एक समान धागा आहे की, ज्यामुळे एक सुंदर पुष्पमाळ सिद्ध होते. माळेला मणी असतात आणि ते एका सूत्रात गुंफतात. त्याप्रमाणे भक्त आणि भक्ती हा समान धागा सूत्र असून संत हे मेरुमणी आहेत. श्री विठ्ठलाच्या नित्यउपासनेसह नैमित्तिक उपासनाकर्म प्रतिवर्षी करावयाची सामूहिक उपासना याला अधिक महत्त्व आहे. प्रतिवार्षिक करावयाच्या उपासनेला वारी ही संकल्पना रुढ आहे. या वारीसाठी एकादशी हा महापर्वकाळ म्हणून निवडण्यात आलेला आहे. त्यामुळे ‘एकादशी म्हणजे काय ? त्याचा वैयक्तिक लाभ काय ?’, असे प्रश्न अनावश्यक आहेत. एकादशीकडे ‘पुण्यसंचय व्हावा’, या एका सद्हेतूने पहाणे गैर आहे. एकादशी व्रताचे सर्वंकश लाभ समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांना होणार आहेत अन् झाले पाहिजेत. हिंदु धर्माच्या प्रत्येक महिन्यात दोन एकादशा येतात. एखाद्या पंधरवड्यात स्मार्त आणि भागवत अशा दोन एकादशा येतात. स्मार्त ही शंकराची एकादशी आणि भागवत ही श्रीविष्णूची एकादशी होय.’
– श्री. काशीनाथ थिटेकाका (हिंदुत्वनिष्ठ), पंढरपूर
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
साधकांनो, कार्य आणि साधना यांमधील भेद ओळखून कार्य करतांना साधना होण्याकडे लक्ष द्या !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !