
‘पंढरपूर, श्री विठ्ठल, श्री रुक्मिणी, एकादशी आणि वारी यांची एक विशिष्ट सांगड आहे. या सर्वांत एक समान धागा आहे की, ज्यामुळे एक सुंदर पुष्पमाळ सिद्ध होते. माळेला मणी असतात आणि ते एका सूत्रात गुंफतात. त्याप्रमाणे भक्त आणि भक्ती हा समान धागा सूत्र असून संत हे मेरुमणी आहेत. श्री विठ्ठलाच्या नित्यउपासनेसह नैमित्तिक उपासनाकर्म प्रतिवर्षी करावयाची सामूहिक उपासना याला अधिक महत्त्व आहे. प्रतिवार्षिक करावयाच्या उपासनेला वारी ही संकल्पना रुढ आहे. या वारीसाठी एकादशी हा महापर्वकाळ म्हणून निवडण्यात आलेला आहे. त्यामुळे ‘एकादशी म्हणजे काय ? त्याचा वैयक्तिक लाभ काय ?’, असे प्रश्न अनावश्यक आहेत. एकादशीकडे ‘पुण्यसंचय व्हावा’, या एका सद्हेतूने पहाणे गैर आहे. एकादशी व्रताचे सर्वंकश लाभ समाज, राष्ट्र आणि व्यक्ती यांना होणार आहेत अन् झाले पाहिजेत. हिंदु धर्माच्या प्रत्येक महिन्यात दोन एकादशा येतात. एखाद्या पंधरवड्यात स्मार्त आणि भागवत अशा दोन एकादशा येतात. स्मार्त ही शंकराची एकादशी आणि भागवत ही श्रीविष्णूची एकादशी होय.’
– श्री. काशीनाथ थिटेकाका (हिंदुत्वनिष्ठ), पंढरपूर
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या आणि तळमळीने अन् भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती मधु मेहता !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनावृद्धी शिबिराच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
साधकांचा आधारस्तंभ असलेल्या आणि भजनांतून देवाला आळवणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या नागपूर येथील कै. (सौ.) जयश्री क्षीरसागर (वय ७१ वर्षे) !
साधक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना मार्गदर्शन करून त्यांना साधना करण्यास उद्युक्त करणारे कर्नाटकातील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ५० वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !