सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या सनातनच्या साधिका सौ. विद्या जाखोटिया (वय ६२ वर्षे) यांचे निधन !

सनातन परिवार जाखोटिया कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

आनेवाडी पथकर नाक्यावर पथकर मुक्तीसाठी उद्धव ठाकरे गटाचे आंदोलन !

पुणे-बेंगळुरू महामार्गावर आनेवाडी आणि तासवडे येथे अन्यायकारक पथकर (टोल) वसुली चालू आहे. या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील वाहने पथकर मुक्त करावीत या मागणीसाठी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने अर्धा घंटा ठिय्या आंदोलन करण्यात आले.

श्रीराममंदिराच्या पार्श्वभूमीवर ७५ सहस्र पुणेकरांनी केले रामरक्षास्तोत्र पठण !

अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने १४ जानेवारी या दिवशी ७५ सहस्र पुणेकर भाविकांनी अत्यंत भक्तीमय वातावरणात स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर रामरक्षास्तोत्र पठण केले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करून तिच्या अपव्यवहाराची ‘एस्.आय.टी.’च्या वतीने चौकशी करा ! – ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज

कोट्यवधी विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात, मंदिर समितीच्या आर्थिक बेशिस्तीमुळे आर्थिक अपव्यवहार होत आहे.

राजगडावरील (पुणे) विनाअनुमती खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई !

राजगडावर खाद्यपदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. गडाच्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये विनाअनुमती खाद्यपदार्थ शिजवून त्याची विक्री करणार्‍या १० विक्रेत्यांवर पुरातत्व विभाग आणि वेल्हे पोलीस यांनी १४ जानेवारी या दिवशी कारवाई केली.

सिंहगडाच्या (पुणे) घाट रस्त्यावर वाहतूककोंडी !

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलीदानाने पावन झालेला ‘सिंहगड’ हा ऐतिहासिक ठेवा जतन होण्यापेक्षा तो पर्यटन क्षेत्र म्हणून पर्यटक मोठ्या संख्येने येतांना दिसतात.

मुंबईसह देशातील संग्रहालये बाँबने उडवण्याच्या धमक्या !

गेले काही दिवस मुंबईत अशा प्रकारच्या धमक्या वारंवार येत आहेत. त्यामुळे अशा धमक्या देणार्‍यांना कडक शिक्षा केल्याविना त्याचे गांभीर्य आणि यंत्रणांवर होणारे परिणाम लक्षात येणार नाहीत !

पंतप्रधानांच्या नाशिक दौर्‍याच्या खर्चाचा हिशोब शासनाने मागितला !

शहर सुशोभीकरणावर झाला कोट्यवधी रुपयांचा व्यय !

भोगावती नदीत दूषित पाण्याने सहस्रो मासे मृत्यूमुखी !

केवळ हिंदूंच्या सणांना कार्यरत होणारे आणि वर्षभर झोपा काढणारे प्रदूषण नियंत्रण मंडळ !

आमच्यातील काही लोक सरकार फोडणार ! – मनोज जरांगे

माझ्यावर (सापळा) ‘ट्रॅप’ लावला असून सरकार मोठे षड्यंत्र रचत आहे. आमच्यातील काही लोक फोडले जाणार आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.