या वर्षात मुंबईतील मेट्रोच्या विविध प्रकल्पांना गती येणार !

या टप्प्याद्वारे सीप्झ, मरोळ, विमानतळाचे दोन्ही टर्मिनल, विद्यानगरी, सांताक्रूझ आणि बीकेसी हे भाग जोडले जाणार आहेत. आरेजवळील सारिपूतनगर ते प्राप्तीकर कार्यालय (बीकेसी) या मार्गिकेवर प्रत्येकी ८ डब्यांच्या १६० फेर्‍या असतील. 

सामाजिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाविषयी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांचा ‘तरुण भारत’ वृत्तपत्र समुहाकडून सत्कार !

यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे आणि रणरागिणी शाखेच्या सौ. रूपा महाडिक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

मिरज येथे भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात श्रीराम मंगल अक्षता कलश शोभायात्रा पार पडली !

अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने शहरात ३१ डिसेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता अयोध्या येथून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलश पालखीची भव्य शोभायात्रा भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात काढण्यात आली.

महाराष्ट्रातील सर्व ‘आय.ए.एस्.’ अधिकार्‍यांच्या मालमत्तेची राज्यशासनाने माहिती मागवली !

महाराष्‍ट्रातील सर्व भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकार्‍यांच्‍या (आय.ए.एस्.) वर्ष २०२३ मधील स्‍थावर मालमत्तेचा तपशील राज्‍यशासनाने मागवला आहे.

श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचा कारभार नवनिर्वाचित विश्वस्तांकडे सुपुर्द !

मुंबई उच्च न्यायालयाच्या ४ सप्टेंबर २०१८ च्या निकालानुसार श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचा कारभार त्रिसदस्यीय प्रशासकीय समितीकडे होता.

अमरावती येथील गुरुकुंज आश्रमाला विशेष गोष्ट म्हणून शासनाकडून ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा !

गुरुकुंज आश्रमात थोर विभूती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र शासनाने राष्ट्र्रसंत तुकडोजी महाराजांना स्वातंत्र्यसंग्राम सैनिक म्हणून गौरवले आहे.

नथुराम गोडसे यांच्या अस्थीकलशाच्या दर्शनासाठी नाशिक येथून यात्रा

‘अखंड हिंदु राष्ट्र’ हे नथुराम गोडसे यांचे स्वप्न होते. ‘सिंधु नदी भारताच्या सीमेत आल्यानंतरच आपल्या अस्थी विसर्जित कराव्यात’, असे गोडसे यांनी म्हटले होते.

लोणी काळभोर (पुणे) येथे अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा बलात्कार !

कपडे धुण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थिनीला घरी बोलावून शिक्षक सुदर्शन शेरमाळे याने वारंवार बलात्कार केला.

हवेली (पुणे) तालुक्यातील मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी केली शासनाची फसवणूक !

हवेली तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार सुनील कोळी यांनी ‘२७ नोव्हेंबर २०१८ ला तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायद्याची प्रावधाने लागू होणार्‍या फेरफार नोंदी करू नयेत

नवा कायदा आणल्यास देशभरातील वाहतूक कोणत्याही क्षणी बंद होईल ! – प्रकाश गवळी, सदस्य, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेस

नवीन ‘भारतीय संहिता २०२३’ नुसार अपघातातील चालकाला १० वर्षे कारावासाची शिक्षा करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक उद्योग धोक्यात आला आहे.