Nilesh Rane : भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांची सक्रीय राजकारणाला साेडचिठ्ठी

‘एक्स’च्या माध्यमातून यासंदर्भातील पोस्ट करून दसऱ्याच्या दिवशीच त्यांनी मोठा राजकीय धक्का दिल्याचे सांगितले जात आहे.

माजी आमदार सुभाष झांबडांसह अजिंठा अर्बन बँकेच्या संचालकांचा ९७ कोटी रुपयांचा अपहार !

रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर येथील अजिंठा अर्बन सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष झांबड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुलकर्णी आणि सनदी लेखापाल (सीए) सतीश मोहरे यांच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुणे येथे बसचालकाने उलट दिशेने गाडी चालवत १५ वाहनांना दिली धडक ! 

सेनापती बापट रस्त्यावरून पी.एम्.पी.एम्.एल्.ची बस चिंचवडला चालली होती. त्या वेळी बसचालक सावंत याने एका चारचाकी वाहनाच्या जवळून गाडी घेतली. त्याचा जाब वाहनचालकाने सावंत याला विचारला.

श्री महालक्ष्मीदेवीची अष्टमीला महिषासूर मर्दिनी रूपातील पूजा ! 

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची अष्टमीला महिषासूर मर्दिनी रूपातील पूजा बांधण्यात आली होती.

‘वाघ बकरी चाय’ आस्थापनाच्या कार्यकारी संचालकांचे निधन 

‘वाघ बकरी चाय’चे कार्यकारी संचालक पराग देसाई (वय ४९ वर्षे) यांचे निधन झाले. गेल्या आठवड्यात कर्णावती येथे मॉर्निंग वॉकच्या वेळेला भटक्या कुत्र्यांनी त्यांवर आक्रमण केले. यात स्वतःचा बचाव करतांना ते पाय घसरून खाली पडले. डोक्याला दुखापत झाल्याने ब्रेन हॅमरेज झाले.

हिंदु समाजाची एकवाक्यता-एकसंघता हे हिंदु समाजाचे वैशिष्ट्य आहे ! – पू. भिडेगुरुजी

श्री दुर्गामाता, गोमाता उपासना यांची उपासना म्हणजेच भारतमातेची उपासना होय. निसर्गात ज्याप्रकारे विविधता आहे, तशाच प्रकारे आपला देशही बहुविध भाषांचा देश आहे. असे असले, तरी हिंदु समाजाची एकवाक्यता-एकसंघता हे हिंदु समाजाचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

ललित पाटील याला २७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी 

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्या पोलीस कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ललित पाटील याला अंधेरी येथील महादंडाधिकारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पुणे येथील ससून रुग्णालयातून ललित पाटील याने पलायन केले होते.

हिंदूंनो ! अजिंक्य समाज आणि त्यांचे राष्ट्रच विजयादशमी साजरी करण्यास पात्र असते, हे लक्षात घ्या !

विजयादशमीनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश ! हिंदूंनो, जो समाज अजिंक्य असतो, त्याचे राष्ट्रच विजयादशमी साजरी करण्यासाठी पात्र असते, हे लक्षात ठेवा ! म्हणूनच विजयादशमीच्या निमित्ताने हिंदु समाजाला अजिंक्य करण्याचा कृतिशील संकल्प करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले