विजयादशमीनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश !
‘श्रीदुर्गादेवीने महिषासुराचा केलेला वध आणि प्रभु श्रीरामाने रावणाचा केलेला वध यांचे स्मरण करून देणारा दिवस म्हणजे विजयादशमी !

हिंदूंच्या सर्वशक्तीमान देवता अजिंक्य असल्याने त्यांचा विजयदिन ‘विजयादशमी’ म्हणून साजरा केला जातो. आजकाल विजयादशमीच्या दिवशी गावाच्या वेशीवरील मंदिरात जाऊन सीमोल्लंघन करणे आणि आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना देणे या कृती केवळ कर्मकांड म्हणून केल्या जात आहेत. मुळात ‘सीमोल्लंघनाची परंपरा देशात का निर्माण झाली ?’, याचा विचार हिंदु समाज कधी करतो का ? ‘आक्रमण हाच बचावाचा सर्वाेत्तम मार्ग असतो’, हे प्राचीन काळातील हिंदु राज्यकर्त्यांना ज्ञात होते; म्हणून शत्रूच्या सीमा उल्लंघण्याची शौर्यपरंपरा देशात निर्माण झाली. आजकाल ही परंपरा लुप्त होऊन ‘निवडणुकीत एखाद्या राजकीय पक्षाचा विजय म्हणजे हिंदूंचा विजय’, असे मानले जाऊ लागले आहे. प्रत्यक्षात नूंह येथील दंगल, मणीपूर येथील हिंसाचार, कन्हैयालालचे केले गेलेले ‘सर तन से जुदा’ (शिरच्छेद), श्रद्धा वालकरचे केले गेलेले ३५ तुकडे, या घटना पाहिल्या, तर सर्वत्र हिंदु समाज पराभवाच्या छायेत जगत असल्याचे लक्षात येते. अशा वातावरणात विजयादशमी साजरी करणे, ही केवळ औपचारिकता आहे. चंद्रयानाने चंद्राची सीमा ओलांडली, तरी ती वैज्ञानिक प्रगती आहे. त्याद्वारे हिंदूंचे सीमोल्लंघन घडले, असे म्हणणे अयोग्य आहे.
हिंदूंनो, जो समाज अजिंक्य असतो, त्याचे राष्ट्रच विजयादशमी साजरी करण्यासाठी पात्र असते, हे लक्षात ठेवा ! म्हणूनच विजयादशमीच्या निमित्ताने हिंदु समाजाला अजिंक्य करण्याचा कृतिशील संकल्प करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पूर्वी एका कुटुंबासारखा एकत्रित असलेला समाज, आणि आजचा हा तुकड्या तुकड्यात विखुरलेला समाज !
पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९४ वर्षे) यांच्या मागील जन्मांतील, तसेच या जन्मातील साधनाप्रवासाच्या संदर्भात सूक्ष्म-ज्ञानातून गवसलेले ज्ञानमोती !
नामजपादी उपायांचे महत्त्व आणि आश्रमात रहाण्याचे लाभ !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
गुरुस्तवन भावांजली : साधकांना गुरुकृपायोगरूपी तारक मंत्र प्रदान करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !