‘वाघ बकरी चाय’ आस्थापनाच्या कार्यकारी संचालकांचे निधन 

भटक्या कुत्र्यांच्या आक्रमणामुळे झाले होते घायाळ !

नवी देहली -‘वाघ बकरी चाय’चे कार्यकारी संचालक पराग देसाई (वय ४९ वर्षे) यांचे निधन झाले. गेल्या आठवड्यात कर्णावती येथे मॉर्निंग वॉकच्या वेळेला भटक्या कुत्र्यांनी त्यांवर आक्रमण केले. यात स्वतःचा बचाव करतांना ते पाय घसरून खाली पडले. डोक्याला दुखापत झाल्याने ब्रेन हॅमरेज झाले. त्यांच्यावर उपचार चालू असतांना निधन झाले. (भटक्या कुत्र्यांच्या समस्येविषयी केंद्र आणि सर्व राज्य सरकरांनी ठोस निर्णय घेणे आवश्यक ! – संपादक)