काश्मीरमध्ये आतंकवाद्याकडून परफ्यूम बाँब जप्त !

काश्मीरमध्ये पकडण्यात आलेल्या आरिफ या आतंकवाद्याकडून परफ्यूम बाँब जप्त करण्यात आला आहे. सुरक्षादलांच्या म्हणण्यानुसार, या परफ्यूमच्या डब्याचे झाकण उघडताच किंवा ते दाबताच त्याचा स्फोट होतो.

हिंडेनबर्गच्या अहवालावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित

लाखो रुपये व्यय (खर्च) करून चालवण्यात येणारे संसदेचे कामकाज अशा प्रकारे गदारोळ करून बंद पाडणार्‍यांकडून हा पैसा वसूल करण्याची आणि अशांची खासदारकी रहित करण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे !

३३ कोटी ६० लाख रुपयांचे कोकेन बाळगणार्‍या प्रवाशास अटक !

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रकार

तमिळनाडूमध्ये हिंदु नेते मणीकंदन यांची हत्या

तमिळनाडूमध्ये हिंदुद्वेषी द्रमुकचे सरकार असल्याने हिंदूंचे आणि त्यांच्या नेत्यांचे रक्षण कसे होणार ?

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात ३ सैनिक घायाळ

झारखंडच्या लातेहार जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेत असतांना नक्षलवाद्यांनी केलेल्या बाँबस्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ३ सैनिक घायाळ झाले. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले.

पाकचे माजी गृहमंत्री शेख रशीद यांना अटक

अटकेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘माझ्या अटकेमागे शाहबाज शरीफ यांच्या सरकारचा हात आहे’, असा आरोप केला आहे.

श्रीरामाच्या मूर्तीसाठीच्या शाळिग्राम शिळा नेपाळमधून अयोध्येत पोचल्या !

ओडिशा आणि कर्नाटक राज्यांतूनही शिळा आणण्यात येणार !

भारत ‘हिंदु राष्ट्र’ आहे !

भारत हे हिंदु राष्ट्र आहे; कारण ज्यांनी हा देश घडवला ते हिंदु आहेत. भारतात रहाणारे सर्व लोक हिंदु आहेत; कारण त्यांचे पूर्वज हिंदु होते.

साधनेचे महत्त्व !

‘निवडून येण्यासाठी राजकारण्यांना जनतेला खुश करावे लागते. याउलट साधना करणार्‍याला देव स्वतःहून निवडतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले