अमरावती येथील जिल्हा शल्यचिकित्सकांनी कोरोनाच्या संकटकाळात भ्रष्टाचार केला ! – पप्पू पाटील, जिल्हा संघटक, मनसे

प्रशासनाने आरोपांची पडताळणी करून जिल्हा शल्यचिकित्सक दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, ही अपेक्षा !

महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक समस्यांविषयी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवेदन !

लांबलेले शैक्षणिक वर्ष, निकालातील संभ्रमावस्था, पुढील शैक्षणिक वर्ष कधी चालू होणार ? परीक्षांमधील गोंधळ, अशा असंख्य प्रश्‍नांमुळे विद्यार्थी हतबल झालेला आहे. तरी महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक समस्यांविषयी लक्ष घालावे, या मागणीसाठी मंत्री उदय सामंत यांना निवेदन देण्यात आले.

गोव्यात १५ जूनपासून संचारबंदी उठवण्याची प्रक्रिया चालू करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा राज्यात १५ जूनपासून संचारबंदी उठवण्याची (‘अनलॉक’ची) प्रक्रिया चालू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व लोकांचे लसीकरण केल्यानंतरच आम्ही पर्यटन व्यवसाय चालू करण्याविषयी विचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सनातन संस्थेचे साधक आणि उपकार्यकारी अभियंता श्री. नीलेश नागरे यांना ‘राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक’ महासन्मान !

अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ अन् विश्‍वात्मक मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने सनातन संस्थेचे साधक आणि उपकार्यकारी अभियंता श्री. नीलेश नागरे यांना ‘राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान २०२१’ने सन्मानित करण्यात आले.

जिल्हाधिकारी शेखर सिंह जनतेच्या या २५ प्रश्‍नांची उत्तरे द्या ! – उदयनराजे भोसले

कोरोनाविषयी जनतेच्या मनात असलेल्या या २५ प्रश्‍नांची उत्तरे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी द्यावीत, असे आव्हान भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे. याविषयीचे एक पत्रक खासदार भोसले यांच्या कार्यालयाकडून काढण्यात आले आहे.

संकटकालीन साहाय्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात सुसंवाद असावा ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

नवीन सत्तासमीकरणांचा इथे विषय येत नाही. केंद्र आणि राज्य यांच्यात संघर्ष नसावा. केंद्र सरकार राज्याचे पालक म्हणून काम करत असते. राज्यांच्या संकटकाळात पंतप्रधानांनी साहाय्य करावे, ही राज्यांची भूमिका आहे.

देशातील प्रत्येक देवस्थानांच्या ठिकाणी भारतीय संस्कृतीचे शिक्षण देण्यास प्रारंभ करावा !

भारतीय संस्कृतीचे शिक्षण देण्याची मागणी करणार्‍या श्री. प्रशांत सुलाखे यांचे अभिनंदन ! यांचा आदर्श घेऊन सर्वच हिंदूंनी असे प्रयत्न करणे काळाची आवश्यकता आहे !

दर्यापूर (अमरावती) येथील काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांना जीवे मारण्याची धमकी !

दर्यापूर – अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार बळवंत वानखडे यांना येथील छत्रपती संघटनेचे अध्यक्ष कपिल पडघान यांनी सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या परिस्थितीचे ‘ऑनलाईन’ प्रसारण करण्यासाठी गेलेल्या एका स्थानिक पत्रकारावर येथील प्रशासनाने कारवाई केल्याचा आरोप होत आहे. कपिल पडघान यांनी या पत्रकाराची बाजू घेतली होती. पडघान यांनी … Read more

स्वरक्षणासाठी शौर्यजागृतीची आवश्यकता ! – गौरव जमदाडे, हिंदु जनजागृती समिती

आपल्या हिंदु कार्यकर्त्यांना मारले जात आहे किंवा त्यांना खोट्या आरोपाखाली कारागृहामध्ये टाकले जात आहे. स्वरक्षणासाठी आपल्याला शौर्यजागृतीविना पर्याय नाही.

बनावट कागदपत्रांचा वापर करून कह्यात घेतलेल्या गाडीची परस्पर विक्री !

कर्जाचे हप्ते थकल्याने जप्त केलेल्या गाडीची (कारची) परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परिवहन अधिकार्‍यांसह १२ जणांविरोधात गुन्हा