शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या कोरोनाकाळात हिंदूंनी मांसाहार करण्याच्या वक्तव्याचा वारकर्‍यांकडून निषेध !

वक्तव्याचा अकोला जिल्ह्यातील विश्‍व वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज शेटे आणि अन्य वारकरी यांनी निषेध व्यक्त केला.

वर्धा येथे दळणवळण बंदीत वाढ केल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयात फळे आणून टाकली !

कोरोना संकटाच्या काळातील दळणवळण बंदीत वाढ केल्याच्या निषेधार्थ येथील संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयात फळांची रास ओतून संताप व्यक्त केला. ८ ते १३ मेपर्यंत लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांत १८ मेपर्यंत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यावर त्याचे सर्वत्र पडसाद उमटलेे.

कोरोनासारख्या संकटकाळात स्थिर रहाण्यासाठी साधना आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोनासारख्या संकटकाळात मनाची स्थिती स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी नुकतेच एका ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

माझ्या देशात लोक मृत्यूमुखी पडत असतांना मी सध्या विवाह करू शकत नाही ! – अभिनेत्री वैशाली टक्कर

‘कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पहाता मी माझा विवाह पुढे ढकलला आहे. ‘विवाह करून देश सोडून जावे’, असे मला अजिबात वाटत नाही. अशा बिकट परिस्थितीत मी आनंदी कशी राहू ? विवाहाचा उत्सव (सेलिब्रेशन) कसा साजरा करू ?

चिखली (जिल्हा बुलढाणा) येथील १० खासगी कोविड रुग्णालयांतील १३ आधुनिक वैद्यांचे सामूहिक त्यागपत्र !

खासगी रुग्णालयांतील आधुनिक वैद्यांकडून चुका होत असल्याचे निदर्शनास आल्यास लोकप्रतिनिधींनी त्या दाखवून त्यांच्याकडून योग्य पद्धतीने सेवा करवून घ्यावी; मात्र आधुनिक वैद्यांच्या कामात सतत ढवळाढवळ करू नये !

रुग्णालयातील खाटांचा काळाबाजार करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवा ! – इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

महानगरपालिकेच्या रुग्णालयांत उपलब्ध खाटांचा नियमित आढावा घ्यावा, तसेच खाटांची विक्री करून काळाबाजार करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा नोंदवा, असे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

बलोपासना करून भक्ती, शक्ती आणि मनोबल वाढवा ! – विजय चौधरी, हिंदु जनजागृती समिती

– देशाची सध्याची स्थिती पुष्कळ विदारक आहे. सर्वत्र नक्षलवाद, हिंसाचार, बलात्काराच्या घटना दिवसागणिक वाढतच आहेत. हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे, संतांची हत्या करणे, काश्मिरी हिंदूंची हत्या असे अनेक आघात होत आहेत. यावरून हिंदू किती असुरक्षित आहेत, हे लक्षात येते.

हिंदूंनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या रक्षणासाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिकणे आवश्यक ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदू शौर्यशाली आणि पराक्रमी आहेत, केवळ त्यांना जागृत करण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे. हिंदूंनी शौर्य गाजवून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. यासाठी कित्येक क्रांतीकारकांना बलीदान द्यावे लागले आहे; पण दुर्दैव असे की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी हिंदूंची….

महाराष्ट्रातील दळणवळण बंदीमध्ये १ जूनपर्यंत वाढ, निर्बंध अधिक कडक

महाराष्ट्रातील दळणवळण बंदी १ जूनपर्यंत वाढवण्यात आली. राज्यशासनाकडून याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येणार्‍या नागरिकांसाठी ‘आर्टीपीसीआर्’ चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची सदिच्छा भेट !

मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात चालू असलेल्या कोरोनावरील लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री तेथे पोचले होते; मात्र तेथे त्यांनी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची भेट घेतली.