हे सरकारला लज्जास्पद !

‘केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांतील १४ लाख ५० सहस्र खटले प्रलंबित आहेत. त्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक म्हणजे २ लाख ५६ सहस्र खटले एकट्या बंगालमध्ये आहेत. यानंतर १ लाख ९२ सहस्र खटले महाराष्ट्रातील आणि १ लाख ६४ सहस्र खटले उत्तरप्रदेशातील आहेत.’  

आदरातिथ्याविषयी मनुस्मृतीतील श्‍लोक

वाहनातील व्यक्ती, ९० वर्षांवरील व्यक्ती, रोगी, ओझे वाहून नेणारे लोक, स्त्रिया, पदवीधारक, राजा आणि नवरदेव यांना (रस्त्यावर चालतांना आधी) वाट करून द्यावी.

अनंतनागमध्ये ६ आतंकवाद्यांना शस्त्रसाठ्यासह अटक

आतंकवाद्यांना पोसण्याऐवजी त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

हे सरकारला सांगावे का लागते ? सरकारला, पोलिसांना कळत कसे नाही ?

‘सिंधुदुर्ग किल्ल्यासह जिल्ह्यातील जलदुर्गांची वर्तमानस्थितीत होत असलेली पडझड थांबवावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या या ऐतिहासिक ठेव्याचे जतन करावे, अशी मागणी ‘माऊंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ने केली आहे.’  

कोरोनापेक्षाही १० पट भयंकर असेल भविष्यातील महामारी ! – बिल गेट्स यांची चेतावणी

‘कोरोनाची लागण ५ वर्षांपूर्वी झाली असती, तर त्यावरील औषध इतक्या लवकर बनवणे शक्य नव्हते,’

कॅसिनोंमुळे राज्यशासनाला मागील ९ वर्षांत १ सहस्र २२७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त

कॅसिनोंमुळे राज्यशासनाच्या तिजोरीत १ सहस्र २२७ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. तरंगत्या कॅसिनोंमुळे ७८५ कोटी ५२ लाख रुपये, तर भूमीवरील कॅसिनोंमुळे ४९१ कोटी ७६ लाख रुपये राज्यशासनाला मिळाले.

हिंगोली जिल्ह्यातील ३ तालुक्यांतील ४० गावांमध्ये भूकंपाचे धक्के !

जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या तालुक्यांमध्ये ३० जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी ४० गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची ३.२ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली आहे.

अकोला येथील सनातनचे साधक तुषार काकड ठरले राज्यस्तरीय ‘गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धे’चे मानकरी !

‘गणलक्ष्मी करंडक एकपात्री साभिनय स्पर्धे’त सनातनचे साधक श्री. तुषार काकड या वर्षी ‘गणलक्ष्मी करंडक’चे मानकरी ठरले. सनातन परिवाराच्या वतीने अभिनंदन !

उच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही कृषीभूमीविषयी प्रशासन उदासीन का ? – ग्रामस्थांचा प्रश्‍न

गत २५ वर्षे नवीन कुर्ली गावात सहस्रो लोक वास्तव्य करत आहेत. ग्रामपंचायत नसल्याने त्यांना शासकीय कामांसाठी लागणारे दाखले मिळत नाहीत. गावातील रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत आवश्यकतांसाठी शासनाकडून निधी मिळत नाही.

भारताला सुराज्याकडे नेण्यासाठी अधिवक्त्यांचे संघटन आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ अधिवक्ता अधिवेशनाचे आयोजन