अरुणाचल प्रदेशमध्ये धर्मांतराची गंभीर समस्या !

पर्यटनाच्या नावाखाली ‘धर्मांतर’ केले जाणे, ही गंभीर समस्या आहे. काही धर्मांतरित हिंदू पूर्वी ते ज्या जातीत होते, त्यांना मिळणारा लाभ उठवतातच.

(म्हणे) ‘भारताने जम्मू-काश्मीरच्या नागरिकांवर लावलेल्या निर्बंधांमध्ये सूट द्यावी !’ – तुर्कस्तान

तुर्कस्तानचे राष्ट्रपती तैयप एर्दोगन यांनीही संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित केला होता.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार

‘पूर्वजांचे ज्ञान, पराक्रम आणि अभिक्रम यांचा अभिमान बाळगणे, हा खराखुरा पूर्वजांच्या परंपरेचा अभिमान बाळगणे होय. पूर्वजांच्या अज्ञानाच्या परंपरेचा अभिमान बाळगणे केव्हाही इष्ट नाही. पूर्वजांचे ज्ञान काही वेळा सध्याच्या वाढत्या ज्ञानाप्रमाणे अज्ञान ठरले असेल, तर ते स्वीकारता कामा नये, हे सावरकरांचे सूत्र !

मराठीचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूतांचा गौरव

आरोग्य, शिक्षण क्षेत्रात समाजमाध्यमांद्वारे विविध उपक्रम राबवून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयामधील प्रतिनिधींचा मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

वरळी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सदनिका लाटल्याचा गंभीर आरोप, न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी योजनेच्या लाभार्थी नसतांना वरळी येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ६ हून अधिक सदनिका लाटल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस चौकशी करणार ! – गृहमंत्री

अनिल देशमुख यांनी सांगितले की, डेलकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अनेकांची नावे आत्महत्या पत्रामध्ये लिहिली आहेत. भाजपचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर केंद्राचा दबाव होता का ? या सर्व त्रासामुळे डेलकर यांनी आत्महत्या केली का ? याची पडताळणी केली जाईल, दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

हे सरकारला लज्जास्पद !

‘केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या संदर्भातील गुन्ह्यांतील १४ लाख ५० सहस्र खटले प्रलंबित आहेत. त्यांपैकी २० टक्क्यांहून अधिक म्हणजे २ लाख ५६ सहस्र खटले एकट्या बंगालमध्ये आहेत.

मुंबईमध्ये आढळणार्‍या ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत !- इकबाल चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

२४ फेब्रुवारी या दिवशी मुंबईमध्ये कोरोनाचे १ सहस्र १६७ रुग्ण आढळले आहेत; मात्र त्यांतील ८३ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी दिली.

महाशिवरात्रीच्या काळात भावाच्या स्तरावर साधना करून शिवाची कृपा संपादन करूया ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रसारक, सनातन संस्था

महाशिवरात्रीच्या औचित्याने पश्‍चिम महाराष्ट्र आणि गोवा येथील साधकांसाठी ‘ऑनलाईन महाशिवरात्री शिबिर’

बंगालच्या मंत्र्यांवरील बॉम्ब आक्रमणाच्या प्रकरणी बांगलादेशी नागरिकाला अटक

ममता बॅनर्जी यांनी ज्यांना त्यांच्या १० वर्षांच्या सत्तेच्या काळात डोक्यावर बसवले, त्याच लोकांनी सरकारमधील मंत्र्यांवर आक्रमण केले.