भारतच नाही, तर संपूर्ण जगात आमचा एक शेजारी देश आतंकवाद्यांना साहाय्य करत आहे ! 

भारताचा एक शेजारी देश केवळ भारतच नाही, तर जगभरातील आतंकवाद्यांना आश्रय आणि साहाय्य करत आहे. याला त्या देशाच्या सरकारचेही समर्थन आहे, अशी टीका भारताच्या प्रतिनिधीने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकचे नाव न घेता केली.

कोल्हापूर येथे २७ फेब्रुवारी या दिवशी अखंड श्रीराम नामजपाचे आयोजन !

सद्गुरु कृपेने २७ फेब्रुवारी या दिवशी पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे ५ ते सायंकाळी ६ या वेळेत १३ घंटे ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार !

येथील सुखसागर परिसरात एकाच रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे २ स्वतंत्र कार्यादेश (वर्कऑर्डर) २ वेगवेगळ्या ठेकेदारांना महापालिका प्रशासनाने दिले. प्रत्यक्ष काम चालू करतांना हा प्रकार लक्षात आल्याने महापालिकेच्या अजब आणि मनमानी कारभाराची चर्चा होत आहे.

श्री सिद्धेश्‍वर देवस्थानचे पंच डॉ. शे.दे. पसारकर (वय ६८ वर्षे) यांचे निधन

श्री सिद्धेश्‍वर देवस्थानचे पंच, तसेच प्रख्यात वीरशैव मराठी साहित्यिक अन् संगमेश्‍वर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ. शे.दे. पसारकर (वय ६८ वर्षे) यांचे २४ फेब्रुवारीच्या रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.

गुंड गजा मारणेच्या मुळशीतील फार्म हाऊसवर पोलिसांची धाड

कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर आतापर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड आणि खालापूर येथील पोलीस ठाण्यांत ६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वैदिक, वैष्णव, शाक्त किंवा शैव परंपरेतील सन्माननीय व्यक्तीची नियुक्ती करावी ! – साधू-महंतांची राज्यपालांकडे मागणी

सांस्कृतिक मंत्रालय मंत्री तथा राज्यमंत्री किंवा राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वैदिक, वैष्णव, शाक्त किंवा शैव परंपरेतील सन्माननीय व्यक्तीची नियुक्ती करावी, अशी मागणी साधू-महंतांनी राज्यपालांकडे केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाकडून ‘सिंधु नदी से सिंधु सागर तक स्वातंत्र्यविरों की बात…’ या कार्यक्रमाचे आयोजन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिन आणि संस्थेच्या जम्मू शाखा स्थापनादिनाचे औचित्य साधून ‘सिंधु नदी से सिंधु सागर तक स्वातंत्र्यविराेंं की बात…’ या कार्यक्रमाचे आयोजन २६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता करण्यात आले आहे.

१ ते १० मार्च या कालावधीत विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ८ मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार 

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत होणार आहे. ८ मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार असून ९ आणि १० मार्च या दिवशी अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. त्यानंतर अधिवेशन समाप्त होईल.

गृहिणीलाच घरातील सर्व कामे करण्यासाठी उत्तरदायी ठरवता येणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

पत्नी म्हणजे एखादी मालमत्ता किंवा वस्तू नाही. घरातील सर्व कामांची अपेक्षा पत्नीकडून करणे चूक आहे. गृहिणीकडूनच घरातील सर्व प्रकारच्या कामांची अपेक्षा केली जाते. ही पती-पत्नीच्या नात्यांमधील असमानता आहे. कोणतेही लग्न हे समानतेच्या तत्त्वावर आधारलेले आहे.

परभणी येथील ४ ग्राहकांकडून १ लाख ५१ सहस्र रुपयांची वीजचोरी !

‘रेडिओ फ्रिक्वेन्सी डेटा कॉन्सेंट्रेटर युनिट’ लावले म्हणून ही वीजचोरी निदर्शनास आली. युनिट न लावल्यामुळे आतापर्यंत अनेक जणांनी वीजचोरी केली असेल, त्याला उत्तरदायी कोण ? यामध्ये महावितरणची लक्षावधी रुपयांची हानी झाली आहे, ती आता कशी वसूल करणार ?