‘अर्जुन पुरस्कार’ प्राप्त सुभेदार अजय सावंत यांचा पणजी (गोवा) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्कार

सुभेदार अजय सावंत यांचा सत्कार ! ‘कोणतेही राष्ट्र त्यातील सैनिक, किसान आणि शिक्षक या ३ क्षेत्रांच्या आधारावर टिकून रहाते. सैनिक प्राण तळहातावर घेऊन देशासाठी लढत असतो. त्यांचा सन्मान हा देशाचा सन्मान असतो.

दैवी गुणांची खाण आणि चालते-बोलते अध्यात्म विश्‍वविद्यालय असलेल्या सनातनच्या ६९ व्या समष्टी संत पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

उद्या कार्तिक कृष्ण पक्ष एकादशीला पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

श्री. संदीप शिंदे आणि सौ. स्वाती शिंदे एक अद्वितीय पती-पत्नी !

कार्तिक कृष्ण पक्ष नवमी (९.१२.२०२०) या दिवशी रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे श्री. संदीप शिंदे आणि ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांचा शुभविवाह झाला. त्यानिमित्त त्यांच्याविषयी साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

 ‘अध्यात्माचा अभ्यास आणि साधना केल्यावर समजते की, विज्ञान हे बालवाडीतील शिक्षणासारखे आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

‘देवद आश्रमातील साधकांची साधना व्हावी’, यासाठी तळमळीने आणि सातत्याने प्रयत्नरत असलेल्या पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

​‘देवद आश्रमातील साधकांची साधना आणि सेवा या दृष्टीने घडी बसवण्यासाठी पू. (सौ.) अश्‍विनी पवार सतत तळमळीने प्रयत्न करतात.

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. स्वाती शिंदे यांना बालसंत पू. वामन राजंदेकर यांच्या संदर्भात आलेली अनुभूती !

पू. वामन मला (मनातूनच) सांगत होते, ‘अगं, संतांना स्थुलाचे बंधन नसते. एखाद्याच्या मनातील भाव, तळमळ जाणून ते ती कसेही करून पूर्ण करतात.’’ त्यामुळे ‘स्थुलातून मी तिकडे येण्याची आवश्यकता नाही. मी सूक्ष्मातून तुझी इच्छा पूर्ण केली आहे.

सनातनच्या रामनाथी आश्रमात आल्यावर विविध यज्ञ आणि याग यांच्या वेळी उपायांसाठी बसल्यावर आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात यज्ञ याग यांना नामजपादी उपायांना बसण्याची संधी मिळते. तेव्हा परात्पर गुरुमाऊलीप्रती अपार कृतज्ञता वाटून मन भरून येते. गुरुमाऊली या यज्ञाला उपस्थित रहाण्याची संधी देत आहेत, यासाठी ‘कृतज्ञता’ हा शब्दसुद्धा अपुरा आहे.

गुरुमाऊली, तुम्ही जिंकलात, आम्ही हरलो ।

प्रत्येक साधकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ।
गुरुमाऊली, कितीही जन्म घेतले, तरी गुरुऋण कसे फेडू आपले ॥

रामनाथी आश्रमातील श्री. चेतन हरिहर यांना साधनेविषयी सुचलेली काही सूत्रे

हृदयात गुरुदेवांना विराजमान करायचे असेल, तर हृदयाची स्वच्छता करणे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे अनिवार्य आहे. अंतःकरणाची शुद्धी केल्यानंतरच गुरुदेव हृदयरूपी मनमंदिरात विराजमान होतात.’

कु. नंदा नाईक यांना यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती

६.५.२०१८ या दिवशीच्या  यज्ञाला मी आश्रमात उपस्थित होते. तेव्हा मला यज्ञातून एक देवी बाहेर येतांना दिसली. तो यज्ञ श्री मातंगीदेवीचा होता. मातंगीदेवीला पोपटी रंग आवडतो आणि यज्ञातून बाहेर आलेल्या देवीच्या साडीचा रंगही पोपटी होता.