भारतात हिंदु आणि मुसलमान यांचा सभ्य समाज निर्माण करण्यासाठी पाकचे ४ तुकडे करा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

असे ट्वीट भाजपचे वरिष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी कन्हैयालाल यांच्या हत्येच्या प्रकरणावरून केले आहे.

मणीपूर येथे भूस्खलन झाल्याने ५५ सैनिक मातीच्या ढिगार्‍याखाली दबले  

सातत्याने कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्यामुळे सैन्याचे ५५ सैनिक मातीमध्ये दबले गेले. यांतील ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही घटना राज्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ घडली.

पुरी येथील जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेस १ जुलैपासून आरंभ !

पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराची वार्षिक रथयात्रा १ जुलैपासून, म्हणजे आषाढ शुक्ल पक्ष द्वितीयेपासून आरंभ होणार आहे. जगन्नाथ पुरी मंदिर हे भारतातील प्राचीन आणि भारतातील पवित्र चारधाम मंदिरांपैकी एक आहे.

कन्हैयालाल यांच्या हत्येचे धागेदोरे इस्लामिक स्टेटशी !

इस्लामिक स्टेट ही जिहादी आतंकवादी संघटना करते तशा पद्धतीने राजस्थानच्या उदयपूर येथे कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. यातील एक आरोपी रियाज अन्सारी याचे इस्लामिक स्टेटच्या ‘स्लिपर सेल’चा गट असलेल्या ‘अलसुफा’शी संबंध असल्याचे समोर आले आहे.

एकनाथ शिंदे गटाकडून आसाम येथील पूरग्रस्तांना ५१ लाख रुपयांचे साहाय्य !

एकनाथ शिंदे यांनी आसाम येथील पूरग्रस्तांना शिवसेनेचे सर्व आमदार आणि सहयोगी आमदार यांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री साहाय्य निधीत ५१ लाख रुपयांचे साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्वीट केले आहे.

बहुमत चाचणीत विजय आमचाच ! – एकनाथ शिंदे

आमच्याकडे ५० आमदार आहेत. कोणत्याही आमदारावर बळजोरी नसून बहुमत चाचणीत आमचाच विजय होईल, असा विश्वास आमदार एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. गौहत्ती येथे श्री कामाख्यादेवीच्या दर्शनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

शिक्षणाधिकार्‍याचे टिळा लावून स्वागत करणार्‍या मुसलमान शिक्षिकेवर मुसलमान शिक्षकाची टीका

टिळा लावण्याला विरोध करणार्‍या अशा शिक्षकांची हिंदुद्वेषी मानसिकताच यातून दिसून येते ! असे शिक्षक विद्यार्थ्यांना एकसंध काय राखणार ?

आज महाराष्ट्र सरकारची परीक्षा : बहुमत सिद्ध करावे लागणार !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील विश्‍वासदर्शक ठराव आणि राज्य सरकारने बहुमत सिद्ध करणे, या उद्देशाने हे अधिवेशन आयोजित करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.

धर्मांध एवढे भयावह आहेत की, भारतातील हिंदूही त्यांच्यापासून असुरक्षित ! – तस्लिमा नसरीन

जिहाद्यांकडून केवळ मुसलमानेतरच नाही, तर सुधारणावादी मुसलमान आणि मुक्त विचार करणारे यांचाही शिरच्छेद केला जातो. धार्मिक कट्टरतावाद हा मानवतेसाठी नेहमीच हानीकारक आहे.

रायपूर (छत्तीसगड) येथील ‘बेली डान्स’चा कार्यक्रम बजरंग दलाने उधळला !

२४ जून ते ३ जुलै या कालावधीत ‘बॅटल ऑफ बेली डान्सर्स’ या नावाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाद्वारे उधळून लावला.